शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसमधील गटबाजीमुळे अशोक शिंदेंचा ‘ना’राजीनामा; दीड वर्षातच पक्षाला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:29 IST

पत्रपरिषदेत माहिती : माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा रामराम

वर्धा : शिवसेना पक्ष सोडून तब्बल दीड वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजीला त्रस्त होऊन काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा देखील पाठविल्याची माहिती २३ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

दीड वर्षापूर्वी कार्यकर्त्यांच्या सहविचाराने मी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माझा पक्ष प्रवेश दिल्लीत होणार होता पण, तांत्रिक कारणामुळे मुंबईत झाला. त्यानंतर मला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्य कमिटीचे उपाध्यक्ष पद देण्याचे ठरविले. पण, तसे झाले नाही. हे पद अमरावती येथील डॉ. सुनील देशमुख यांना दिले. तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, चारुलता टोकस यांना हिंगणघाट विभागातील कामाच्या याद्या दिल्या. २५/ १५ च्या कामांची यादी दिली. विविध कार्यक्रम घेतले मात्र, जिल्ह्यातील गटबाजीमुळे ही सर्व कामे परस्पर इतरांना दिली.

गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाला ग्रासले असून याला जिल्ह्यातील पदाधिकारी कारणीभूत आहेत, असा आरोप अशोक शिंदे यांनी केला. माझ्या कार्याची दखल तर घेतलीच नाही शिवाय माझा सोशल रिस्पेक्टही हिरावून घेतला यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून माझ्यासह समुद्रपूर तालुक्यातील कार्यकर्ते तसेच जवळपास एक हजारांवर कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे अशोक शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणAshok Shindeअशोक शिंदेcongressकाँग्रेसwardha-acवर्धाNana Patoleनाना पटोले