शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘ईगल सिड्स बायोटेक’विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपं.स. कृषी अधिकाऱ्यांची तक्रार । सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी हिंगणघाट पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ईगल सिड्स बायोटेक लिमिटेडवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२० सह बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी बियाणे नियम १९६८ चे कलम ३४ ए (२) अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध कृषी विभागाने केलेल्या फौजदारी कारवाईमुळे इतर बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.प्राप्त माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील शीतल विठ्ठल चौधरी, रा. गोविंदपूर या शेतकऱ्यासह इतर पाच शेतकऱ्यांनी एकूण २४.२० हे. क्षेत्रावर १० जून ते १३ जून या कालावधीत ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली. परंतु, ईगल इक्सलंट प्लस हे सोयाबीन बियाणे अंकुरले नाही. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी १९ जूनला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून शेतकरी चौधरी यांनी केली.सदर तक्रार प्राप्त होताच २३ जूनला हिंगणघाटचे उपविभागीय कृषी अधिकारी एन. एन. घोडमारे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड, पं.स.चे कृषी अधिकारी एम. एस. डेहनकर, मंडळ कृषी अधिकारी एस. डी. सुतार, आर. एस. गाडगे आदींनी तक्रारकर्त्या शेतकºयाचे शेत गाठून पाहणी केली. शिवाय बियाण्यांचे काही नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल ईगल कंपनीच्या विरोधात आल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे व प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी संजय बमनोटे यांच्या मार्गदर्शनात सदर कंपनीवर फौजदारी करवाई करण्यात आली आहे. असे असले तरी नुकसानग्रस्त शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.उगवण क्षमता केवळ १३ टक्केचकृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असल्यास एकरी २६ किलो सोयाबीन बियाणे पेरणीसाठी पुरेसे असते. मात्र, शेतकऱ्याने एकरी ३० किलो बियाणे पेरणी करून सुद्धा एका चौरस मध्ये सरासरी ३२ ते ३३ रोपे उगवणे आवश्यक असताना केवळ ४ रोपे एका चौरस मिटरमध्ये उगवल्याचे निदर्शनास आले म्हणजे कंपनीच्या सोयाबीन बियाणे वाणाची केवळ १३ टक्के उगवण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.मंत्र्याच्या दौऱ्यातून शेत वगळल्याचा आरोपहिंगणघाट तालुक्यात गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांच्या शेतातील ६० एकरातील ईगल कंपनीचे बियाणे उगवले नाही. कृषी मंत्र्यांनी सोमवारी दौरा आयोजित केला आहे. मात्र या दौऱ्यात गोविंदपूर वगळण्यात आल्याचा आरोप शेतकरी चौधरी व शिवसेनेचे नेते तुषार देवढे यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र