शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

देखभाल-दुरूस्तीच्या कामांसाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:35 AM

राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्देखासदारांचे जलसंधारणच्या सचिवांना साकडे : जलयुक्त शिवारबाबत झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. जी कामे झाली त्या कामांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी राज्याच्या जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सरकारच्या निधीसोबतच विविध कंपण्यांच्या सि. एस. आर. व लोकसहभागातून कामांकरिता निधी उपलब्ध राहत आहे. कामे पुर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेतून देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद आवश्यक आहे. सद्यास्थितीत अनेकवेळा पुर्ण झालेल्या कामांवर निधीची गरज असताना तरतूद नसल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अनेक ठिकाणी उल्लेखनिय कामे झाली आहेत. शिवाय झालेल्या कामांच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधीची गरज असल्याने या विषयी सरकारने गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून खा. रामदास तडस यांनी केली आहे. सदर निवेदन देताना खा. तडस व जलसंधारण विभागाचे सचिव डवले यांच्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत होत असलेल्या व झालेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील तामसवाडा प्रकल्पासह इतर प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी डवले वर्धेत आले होते. निवेदन देताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माधव कोटस्थाने हजर होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस