गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:32 AM2018-10-03T00:32:26+5:302018-10-03T00:33:24+5:30

महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.

Gandhi thought gave the best message | गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश

गांधी विचारच सर्वोत्तमचा दिला संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधींनी केले नेतृत्त्व : काँग्रेसची ‘गांधी विचार यात्रा’

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या विज्ञान युगात अनेकांसाठी मार्गदर्शक असून ते सर्वोत्तम असल्याचा संदेश गांधी विचार यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या या गांधी विचार यात्रेचे नेतृत्त्व अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केले.
स्थानिक सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूतळ्यापासून ही गांधी विचार यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजतापासूनच महात्मा गांधी पुतळा परिसरात एकत्र होण्यास सुरूवात केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी तेथे एकच गर्दी केली होती. दुपारी २.४० वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरातून सुरू झालेली ही पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, इतवारा चौक, मुख्य बाजारपेठ, सोशालिस्ट चौक, वंजारी चौक मार्गक्रमण करीत स्थानिक रामनगर भागातील सर्कस मैदान येथे पोहोचली. तेथे पदयात्रेचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. गांधी विचार यात्रेत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सूतमाला अर्पण करून केले राष्ट्रपित्याला अभिवादन
खा. राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळा परिसरात दुपारी २.४० वाजताच्या सुमारास दाखल झाला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून खाली उतरलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिव्हील लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुपारी २.४६ वाजताच्या सुमारास सूतमाला अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रेला सुरूवात झाली.

पोलिसांची झाली दमछाक
खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील पदयात्रेसाठी वर्धा शहरातील गांधी पुतळा परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हळू हळू या स्थळी गांधी संवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी एकच गदी गेली. अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक सदर यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे एकत्र झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
सुरक्षा कवचात निघाले राहुल गांधींचे वाहन
गांधी पुतळ्याजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी उसळली होती. यावेळी त्या गर्दीला आवरतांना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. खा.राहुल गांधी यांनी येथे येताच नागरिकांकडे धाव घेतल्याने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. पोलीस व सुरक्षा रक्षकांच्या कवचातच राहूल गांधी यांचा ताफा सभास्थळाकडे रवाना झाला.

Web Title: Gandhi thought gave the best message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.