शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये मदत द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 3:59 PM

कृषी विभागाला सूचना : ई-पीक पाहणी अट रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : राज्यातील खरीप हंगाम २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. मात्र, ई-पीक पाहणीची अट टाकल्याने शेतकरी योजनेतून वंचित राहत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार दादाराव केचे यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली. आता सरकारने अट रद्द करून सरसकट अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला.

कापूस व सोयाबीन पिकांमध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे सोयाबीन व कापसाच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार केचे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मदतीसाठी ई पीक नोंदणीची अट घालण्यात आली होती. आता २०२३ मधील शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्यासाठी ई- पीक नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले. त्यामुळे आर्वी मतदारसंघातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आमदारांनी सरसकट पाच हजारांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना देण्याची सूचना केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया वायवाळ, मंडळ अधिकारी रवींद्र उघाडे, मंडळ अधिकारी दिनेश सावळे, कारंजा तालुका कृषी अधिकारी रमेश वाघमारे यांच्यासह आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील कृषी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र