शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा द्या ..अन्यथा तहसील कार्यालयाला घेराव घालू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 3:59 PM

अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जडणघडणीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. समाजव्यवस्थेने कायमच डावललेल्या मातंग समाजाला प्रत्येक प्रश्नासाठी सतत संघर्ष करावा लागतो. 

गावात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, या समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमास एकत्रित येण्यास कुठलेही स्थान आणि समाजाची प्रेरणा असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा साधा पुतळादेखील नसल्याने मोठी अडचण समाजापुढे निर्माण झाली आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. हा दिवस सामान्यतः पावसाळ्यात येत असल्यामुळे सभागृहाअभावी या दिवशी कुठलेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व समाजभवनासाठी भूखंड मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे यांनी २०२२ मध्ये एक महिन्यात भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उमाळे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने वर्धा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बंडू कासारे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अतुल शेंदरे, जिल्हा सचिव राहुल गजभिये, तालुकाध्यक्ष प्रवीण ढाले. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव कदम, विपिन नगराळे, अश्विन परमार, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, शैलेश जगताप, निखिल नगराळे, आकाश मानकर, अजय डोंगरे, प्रशांत डोंगरे, सुनील बावनकर, आलोक चौधरी, अतुल बावणे, नितीन निखाडे, गंगा डोंगरे, वंदना कासारे, मनीषा डोंगरे, सुलभा बावनकर, कांचन बावनकर, मंदा गवळी, आदी उपस्थिती होती.

पंधरवड्याचा अल्टिमेटमयेत्या १५ दिवसांत सेवाग्राम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व सभा मंडपासाठी भूखंड न दिल्यास वर्धा जिल्ह्यातील मातंग समाज, संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला घेराव घालेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी निवेद- नातून देण्यात आला.

 

टॅग्स :wardha-acवर्धा