शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:20 IST

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

वर्धा : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांतून विकासाची कामे करताना ती गुणवत्तापूर्वक, कालमर्यादेत व पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. विभागांनी कामे करताना या बाबीचे पालन केले पाहिजे. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व सेवाभावनेतून काम करावे, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात विविध विभागांच्या विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक राकेश सेपट उपस्थित होते. शिक्षण सर्व समाजाच्या प्रगतीचा पाया असून, समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कृषि विभागाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, पॉली हाऊस, कृषी वाचनालय, दुग्ध योजना, वनशेती, माती परीक्षण, ड्रोन फवारणी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरुवातीस जिल्ह्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीला सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

निराधारांचे मानधन वेळेत जमा करा

शासनाने निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली असून, त्यांना १२० दिवसांत अनुदान देणे अपेक्षित आहे. असे असताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन अनुदान वेळेवर लाभार्थींच्या खात्यात जमा होईल याकडे लक्ष द्यावे.

जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या शासकीय रुग्णालयांच्या बांधकामासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा. रुग्णालयांमध्ये पर्याप्त प्रमाणात औषधी साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, बैठक व्यवस्था याकडे लक्ष सांगितले.

आमदारांनीही वेधले लक्ष

- आमदार समीर कुणावार : यांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण, जीर्ण झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, नव्याने बांधण्यात आलेल्या नगर परिषद इमारतीच्या फर्निचर याकरिता निधीच्या मागणीसह शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवाढीचा मुद्दा उपस्थित केला.

- आमदार दादाराव केचे : यांनी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याबाबत प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारGovernmentसरकारwardha-acवर्धा