शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

‘ग्रीन आर्मी’ने गाठला २४ हजार सदस्यांचा पल्ला

By admin | Published: May 04, 2017 12:40 AM

जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे.

वन संवर्धनाचा उपक्रम : नोंदणीत सेलू तालुका अव्वल प्रशांत हेलोंडे   वर्धा जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे. काही वर्षांपर्यंत केवळ सामाजिक संघटनांचा पुढाकार असलेल्या बहुतांश चळवळी आता शासनाने सक्तीच्या केल्या जात आहेत. यातच ‘ग्रीन आर्मी’चे उद्दीष्ट वन विभागाला देण्यात आले आहे. वन विभाग या उद्दिष्ट पूर्तीसाठी सरसावला असून वर्धा जिल्ह्याने २४ हजार सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे. वन विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो; पण त्याला विशेष महत्त्व दिले जात नव्हते. हा उपक्रम शाळांपूरताच मर्यादित झाला होता. आता वाढते प्रदूषण, पाणीटंचाई, वृक्षांची कत्तल व ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता ग्रीन आर्मीमध्ये कुणालाही सदस्य होता येणार आहे. यामुळे ही फौज वाढवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात वन विभागाला २४ हजार ७९४ सदस्यांची नोंद करता आली आहे. यात आर्वी तालुक्यात २ हजार ५१४, आष्टी २ हजार ९१५, देवळी ३३५, हिंगणघाट २ हजार १२३, कारंजा ४ हजार ९२८, समुद्रपूर ३ हजार २४४, सेलू ५ हजार ४९८ तर वर्धा तालुक्यात ३ हजार २३७ सदस्यांची नोंद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षणासह माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यात जंगलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण व संवर्धन या तीनही बाबी महत्त्वाच्या असल्याने त्या दृष्टीने वन विभागाच्या कामाची दिशा ठरविण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित असणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४८ अ नुसार वन्यजीव पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला वन व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनाची संधी उपलब्ध करून देणे आणि लोकसहभाग मिळविण्यासाठी ग्रीन आर्मी सशक्त करण्याचे उद्दिष्ट वन विभागाला देण्यात आलेले आहे. कोण होऊ शकतो सहभागी राज्यातील प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या महाराष्ट्र हरित सेनेचा सदस्य होऊ शकतो. यात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी, अधिकारी (कार्यरत तसेच सेवानिवृत्त), खासगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक यापैकी कुणालाही ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारता येऊ शकते. पर्यावरण संवर्धनासाठी सदस्यांकडून अपेक्षा ग्रीन आर्मीच्या सदस्य, स्वयंसेवकाने वन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे. यात वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वन संरक्षणासाठी सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणना, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासह वनमहोत्सव कालावधीत राबविल्या जाणारे उपक्रम, वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणाबाबत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग अपेक्षित आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली आदी जनजागृती कार्यक्रमांत सहभाग तथा त्यांच्या क्षेत्रातील वन, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरणाशी निगडीत कार्यक्रम, उपक्रमांमध्ये सहभागाची अपेक्षा आहे सामूहिक नोंदणीचाही पर्याय सामूहिक स्वरुपातही सदस्य नोंदणी करता येते. यात निमशासकीय संस्था, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होता येते. यासाठीही संकेतस्थळामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.