शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:32 AM

पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री

रात्रभर मुसळधार : सात गावांचा संपर्क तुटला, तीन रस्ते बंद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले नव्हते; पण मंगळवारी रात्री कोसळलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहू लागले. रात्रभर आलेल्या पावसामुळे चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला होता. सोनेगावचा रस्ता वाहून गेला तर अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा ठप्प झाला होता. मंगळवारी रात्री जिल्ह्यात ५०१.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यात १०५.२० मिमी झाला. समुद्रपूर तालुक्यात ९८ मिमी, देवळी ७२ मिमी तर वर्धा तालुक्यात ६५.८० मिमी पावसाची नोंद झाली. शिवाय सेलू तालुक्यात ६२ मिमी, आर्वी ३६ मिमी, आष्टी (श.) ३३.२० मिमी तर कारंजा तालुक्यात २९.६० मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे यशोदा नदीला पूर आला. या पुरामुळे वायगाव-राळेगाव मुख्य मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे सरूळ, चना (टाकळी), सोनेगाव (बाई), आलोडा, बोरगाव, निमसडा, पात्री, ममदापूर या गावांसह अन्य गावांचा संपर्क तुटला होता. पुलावरून पाणी असल्याने राळेगाव-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नदीला लागून असलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे चना (टाकळी) येथील पूल वाहून गेला. यामुळे ग्रामस्थांना गावातच अडकून पडावे लागले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; पण प्रारंभी पावसाने हुलकावणी दिली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यानंतर बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची पिके बचावली. जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नव्हता. मंगळवारी रात्री मात्र जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाचे आगमन झाले. रात्री ११ वाजतापासून सकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. परिणामी, जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.