शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गरिबांना घरकुलाची आशा; नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:01 IST

सात हजार घरकुलांना मंजुरी : मोजकीच घरे पूर्ण, अनुदानाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात 'पीएमएवाय' अंतर्गत मंजूर घरकुलांपैकी ५ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला; तर २ हजार १० लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार, असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मंजुरीनंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळाल्याने बांधकामे गतीने सुरू झाली. दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात अनुदानाला थांबा देण्यात आला होता. अनेकांनी उसनवार करून घराची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, अनुदान न मिळाल्याने आता लाभार्थ्यांची कोंडी होत आहे. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही. पण, संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी उपलब्धतेनुसार अनुदान वितरीत केले जात आहे. या बांधकामासाठी रकमेचा व लागणाऱ्या साहित्याचा विचार केल्यास हे घरकुल बांधणे अवघड झाले आहे. सिमेंट, लोखंड, वाळूचे दर गगनाला भिडल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. 

६,९८८ घरे अपूर्ण चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला साडेसात हजार घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गत आठ महिन्यात केवळ २८ घरे पूर्ण झाली आहेत. ६ हजार ९८८ घरे अपूर्ण आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी असला तरी वेळेत ही घरे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणत्या तालुक्यात किती घरकूल मंजूर? तालुका                  मंजूर घरे आर्वी                        ९७७ आष्टी                        ६३८ देवळी                     १,०२६ हिंगणघाट                १,३०२ कारंजा                     ७२२ समुद्रपूर                   ९९६ सेलू                         ७६१ वर्धा                         ५९४

५ हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हप्ता या योजनेअंतर्गत पात्र ५ हजार ६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे, तर दुसरा हप्ता १८८, तर तिसरा हप्ता केवळ ५७ जणांना देण्यात आला आहे.

जिल्ह्यात ७ हजार ६२३ घरकुलांना मान्यता जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी ७ हजार ६२३ घटकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाgovernment schemeसरकारी योजना