शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून कार्य केल्यास त्यांचे भविष्य चांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:19 IST

काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देभाजपची गांधी संकल्प यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर कृती करून सरकार चालवित असल्याचा देखावाच काँग्रेसने केला. त्यामुळेच सध्या त्यांचे हे हाल झाले आहेत. गांधींच्या विचारावर त्यांनी कधीच सरकार चालविले नाही. महात्मा गांधी हे केवळ काँगे्रसचे नसून देशासह जगाकरिता आदर्श आहेत. काँग्रेसने गांधी चरित्राचे आत्मचिंतन करून तसूभर जरी काम केल्यास काँग्रेसचे भविष्य चांगले राहील, अशी टीका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.भारतीय जनता पार्टीच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्धा शहरातून गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात झाली. यावेळी ना. बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सेवा दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या शांतीचा संदेश देणाऱ्या पदयात्रेच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. समाजातील शेवटच्या घटकासाठी सरकारच्या पदाचा वापर आम्ही करण्याचा संकल्प या यात्रेच्या निमित्ताने केल्याचे याप्रसंगी ना. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या संकल्प यात्रेत खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे, माधव कोटस्थाने, माजी खासदार विजय मुडे, अर्चना वानखेडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक निलेश किटे, जयंत सालोडकर, पवन राऊत, मिलिंद भेंडे, शरद आडे, वरुण पाठक, वंदना भूते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी