शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:20 PM

कामात अनियमितता भोवली : एकही ट्रान्झेक्शन न झालेल्या आयडी केल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वसामान्यांना विविध दाखल्यांकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत; त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा आणि गावागावांतच सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू केले होते; परंतु काही केंद्र संचालकांनी या सेवेला हरताळ फासून दुकानदारी चालविल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने तपासणी मोहीम आरंभली. तपासणीअंती अनियमितता आढळून आल्याने तिन्ही उपविभागांतील एकूण १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रां'चे परवाने रद्द करून त्यांना कायमचे टाळे ठोकले आहेत.

जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतील आठही तालुक्यांमध्ये शासनाकडून टप्प्याटप्प्यांत ८३० आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांतून विविध प्रमाणपत्रे व दाखले उपलब्ध करून दिले जातात. विशेषतः कोणत्या दाखल्याकरिता किती कालावधी व किती रक्कम आकारली जावी, याचीही नियमावली शासनाकडून ठरवून दिली होती; परंतु बहुतांश आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी या केंद्रांच्या माध्यमातून आपली दुकानदारी चालविली होती. अवाच्या सव्वा शुल्क आकारणे, तसेच नियमबाह्य प्रमाणपत्र देण्याचे प्रकारही जिल्ह्यात उघडकीस आले. गेल्यावर्षी या गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना करून तपासणी करण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र संचालकांची सुनावणी घेतली. त्यानंतर १७७ केंद्रांचे परवाने रद्द केले.

गरिबांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी निर्मितीशासनाने जवळपास प्रशासनाच्या सर्व सुविधा ऑनलाइन केली आहे. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह लहान-मोठ्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते आहे.

या सुविधा देणे अपेक्षितआपले सेवा केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना उत्पन्नाचा दाखला, अधिवास, शपथपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, अकृषक परवाना, वारस प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणत्र देणे अपेक्षित आहे.

तालुकानिहाय केंद्रउपविभाग                           केंद्रांची संख्या वर्धा                                           ७४आर्वी                                          २८हिंगणघाट                                    ७५

रद्द केलेले परवानेतालुका                      केंद्र                      रद्द केलेले केंद्रआर्वी                            ७९                              १३आष्टी                            ४९                              ०२कारंजा                         ५२                               १३देवळी                         १०६                              १७सेलू                             १०१                              २७वर्धा                             १९८                             ३०हिंगणघाट                     १४३                             ३४समुद्रपूर                       १०२                             ४१

"जिल्ह्यात ज्या आपले सरकार केंद्र संचालकांनी आयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन केलेले नाही अशा १७७ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेआहेत. यामुळे नवीन केंद्र संचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे."- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

आयडी घेतल्यापासून एकही ट्रॅन्झक्शन नाही; परवाना रद्दआयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन नाही गावातील नागरिकांना प्रशाकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ८३० केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल १७७ आपले सेवा केंद्राच्या आयडीवरून एकही ट्रान्झेक्शन झाले नसल्याने या आयडी बंद करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धा