शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत नव्या युगाकडे वाटचाल करतोय"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 18:31 IST

मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, असे खासदार तडस म्हणाले.

ठळक मुद्दे केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या आठ वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पार करून भारत देश एका नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. शिवाय जगभर वेगळी छबी भारताने निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

खा. तडस म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयची कल्पना मोदी सरकारने खऱ्या अर्थाने राबवली आहे. कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांना मोफत धान्य देण्यात आले. इतकेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारने गरीब कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

मोदींच्या नेतृत्वातच देशाची ओळख सुरक्षित भारत, प्रतिष्ठित भारत, आत्मनिर्भर भारत म्हणून विकसित होत आहे. जनधन, उज्ज्वला, स्टार्टअप, जल जीवन मिशन, पीएम आवास, प्रधानमंत्री किसान सन्मान आदी योजना अनेकांना दिलासा देणाऱ्याच आहेत. तर जम्मू कश्मीर येथील कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट स्ट्राइक असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतले असल्याचे तडस म्हणाले.

शहीद भूमीतून निघणार विकास यात्रा

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरही पोहोचावी या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहीद भूमी अशी ओळख असलेल्या आष्टी येथून ११ जून रोजी विकास यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप १४ जून रोजी सेवाग्राम येथे होणार आहे. शिवाय जिल्ह्यात सेवा सुशासन गरीब कल्याण पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Tadasरामदास तडसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी