शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

‘हर घर तिरंगा’; बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच भारताची आत्मनिर्भर वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 18:27 IST

Wardha News बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्दे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सेवाग्राममधून निघाली बाईक रॅली

सेवाग्राम (वर्धा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वावर चालत सर्वांगीण विकासासाठी जे परिवर्तन बापूंना अपेक्षित होते ते सध्या घडत आहे. याला पुढे नेत असताना नवीन शिक्षा प्रणालीच्या माध्यमातून स्वभाषेत शिक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे. बापूंची स्वदेशीची संकल्पना समोर ठेवूनच आत्मनिर्भर भारताची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपकडून सेवाग्रामपासून बाईक रॅलीचे आयोजन केले होते. याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी सेवाग्राम आश्रमात प्रार्थना केली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सेवाग्राम आश्रमात पोहोचताच आश्रम प्रतिष्ठानकडून सूतमाळा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्मारकांची माहिती घेतल्यानंतर बापू कुटीत प्रार्थना झाल्यानंतर बापू कुटी समोरील प्रांगणात सामूहिक सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत, वैष्णव जन तो भजन आणि शांती पाठ झाला.

‘बापूंनी सामान्य जनांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेतले. त्यांच्यामुळेच हा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. बापूंनी दरिद्र्य नारायणाच्या सेवेचा संदेश दिला होता. तेच कार्य पंतप्रधान गरीब कल्याण अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत. तीन कोटी लोकांना घरे, अडीच कोटी लोकांना सोयी, पाच कोटी लोकांना गॅस आणि नळ जोडणी दिली आहे’, असे सांगून सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीतून आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असेही फडणवीस म्हणाले. यानंतर प्रशासनातर्फे चरखागृहात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले.

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार रामदास आंबटकर, आमदार समीर कुणवार, माजी खासदार सुरेश वाघमारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत, वासुदेव रोहणकर उपस्थित होते. त्यानंतर हुतात्मा स्मारक ते आर्वी नाक्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आश्रमात नोंदविला अभिप्राय...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने बापू कुटीला भेट दिली. भारताचा अमृतमहोत्सव बापूंमुळेच आपण अनुभवतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातून शक्य आहे. अंत्योदयाचा मंत्र सर्वसमावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अधिष्ठित समाज रचना, सर्वांना संधीची समानता आणि विचार, पूजा पद्धतीबाबत आदरभाव हाच आपला मूलमंत्र आहे. आज देशात गरिबांचे कल्याण म्हणजे बापूंनी सांगितलेली दरिद्र्य नारायणाची सेवाच होय. बापू कुटीत नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज व समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न सर्व मिळून करुया, असा अभिप्राय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSewagramसेवाग्राम