शहरं
Join us  
Trending Stories
1
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
4
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
5
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
6
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
7
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
8
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
9
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
10
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
11
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
12
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
13
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
14
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
15
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
16
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
17
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
18
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
19
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?

वणाच्या अस्तित्वावर घाला

By admin | Published: February 19, 2017 1:50 AM

रेतीघाट लिलावांतून शासनाला महसूल मिळतो, ही बाब खरी असली तरी या माध्यमातून होणारा रेतीचा

नदी ठरतेय खडकांचा प्रदेश : पर्यावरण संवर्धन संस्थेने वेधले लक्ष हिंगणघाट : रेतीघाट लिलावांतून शासनाला महसूल मिळतो, ही बाब खरी असली तरी या माध्यमातून होणारा रेतीचा अतिरेकी उपसा नद्यांच्या जीवावर उठला आहे. सध्य वणा नदी अखेरच्या घटकाच मोजत असून अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. वणा नदी डबक्यात रूपांतरीत झाली असून रेतीची निर्मितीही होत नाही. परिणामी, जैविक विविधताही नष्ट होत आहे. पर्यावरण विभाग व प्रशासनाने याकडे लक्ष देत नदी वाचविणे गरजेचे झाले आहे. शहराला वेढा घालून वाहणारी वणा नदी रेतीच्या अतिउपस्यामुळे सध्या मृतप्राय झाली आहे. नदीचे डबक्यात रुपांतर झाले असून पात्रात शेवाळ वाढले आहे. नदी विद्रुप झाली. परिणामी, पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून जैविक विविधता नष्ट झाली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून नदी पात्रात वाळू नसल्याने नदी कोरडी झाली आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे नदी पात्रात वाळूचा भरणा करून पुढे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला वाचवावे व नदीचे सौंदर्य टिकवावे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन संस्थेने तहसीलदार सचिन यादव यांना निवेदनातून केली आहे. या बाबीकडे त्वरित लक्ष देऊन शहराची ओळख असलेल्या वणा नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही आशिष भोयर, अभिजीत डाखोरे, मनोहर ढगे, छत्रपती भोयर, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, प्रवीण कडू, ज्ञानेश चौधरी, सतीश चौधरी, नितीन शिंगरू, योगेश तपासे, हेमंत हिवरकर, सचिन थूल यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी) रेती नसल्याने नदी पात्राला पडली कोरड प्रशासनाकडून महसूल मिळविण्यासाठी रेती घाटांचे लिलाव केले जातात. यात घाट धारकास रेती काढण्याचे प्रमाण ठरवून दिले जाते. असे असले तरी ते केवळ कागदावरच असते. अर्थपूर्ण व्यवहारांतून अक्षरश: नदीचे पात्रच ओरबाडले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नद्यांचे अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गत कित्येक वर्षांपासून वणा नदीतील रेतीचा अतिरेकी उपसा केला जात आहे. आता या नदीमध्ये रेतीच शिल्लक राहिली नसल्याने नदी पात्राचे रुपांतर डबक्यात झाले आहे. परिणामी, पाण्यातील जीव-जंतू नष्ट होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.