शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

सुक्ष्म सिंचन योजनेतून ४० गावांना सिंचन सुविधा

By admin | Published: May 04, 2017 12:43 AM

केंद्र शासनाने निम्न वर्धा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सहभागी केला आहे.

शासनाकडून मान्यता : २६ कोटी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आर्वी : केंद्र शासनाने निम्न वर्धा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सहभागी केला आहे. निम्न वर्धा प्रकल्पावरून मौजा बोरगाव (हातला), धनोडी (बहा.) सुक्ष्म सिंचन योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या सुक्ष्म सिंचन योजनेसाठी २६ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून तालुक्यातील ४० गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेरच्या भागातील ४० गावांना शेतीसाठी सिंचनाच्या दृष्टीने हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. या योजनेसाठी निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यातून २४.०३ दलघमी इतके पाणी या प्रकल्पासाठी राखीव करण्यात आले आहे. तालुक्यातील ४० गावांतील ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांना सुक्ष्म सिंचनाद्वारे स्वयंचलित पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेसाठी निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलाशयातून २४.०३ दलघमी इतके पाणी धनोडी येथील कालव्यातून पंपाच्या साह्याने उचलून ८ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला बंदिस्त नलिकेद्वारे व सुक्ष्म सिंचनाद्वारे ०.४१ प्रती हेक्टर प्रमाणे देण्याचे नियोजन आहे. या सुक्ष्म सिंचनाद्वारे १ हेक्टरपर्यंत सिंचन करण्याची सुविधा करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी ३३ केव्ही क्षमतेचे विद्युत सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. शिवाय शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम, पाणी वापर संस्थेची मुख्य इमारत, पंपगृहातील परिसरातील अंतर्गत रस्ते आदी कामांचे नियोजनही या प्रकल्पात राहणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करून घनमापन पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी वितरीत करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)