शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना वर्धा पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 10:54 IST

रात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. सध्या त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस सुरु असून सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम पोलीस ठाण्यात सुरु आहे विचारपूस सकाळी साडे अकरा वाजता करणार न्यायालयात हजर 

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधीविषयी(Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजावर(Kalicharan Maharaj) वर्धा शहर पोलिसात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हे छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होते. यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत वर्धेला आणले.

रात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. सध्या त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस सुरु असून सकाळी साडे अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजीची कर्मभूमी राहिला आहे. कालीचरण महाराज विरोधात सर्वात पहिली तक्रार वर्ध्यात झाल्याने गुन्हा दाखल सुद्धा वर्धा जिल्ह्यात करण्यात आला होता.

२६ डिसेंबरला रायपूरच्या धर्मपरिषदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानतंर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पहिली तक्रार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी २८ डिसेंबरला शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करत आज त्यांना न्यायालयात आणण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMahatma Gandhiमहात्मा गांधीPoliceपोलिसArrestअटक