शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

यंदा ४.१८ लाख हेक्टरवर खरीप

By admin | Published: April 25, 2017 12:55 AM

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे.

६३ हजार ५७५ क्विंटल बियाणे तर ७३ हजार ४०० मे.ट. खताची गरज वर्धा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे. यात कापूस २ लाख २२ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५० हेक्टर, तूर ७७ हजार ७०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. गत वर्षीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र ६ हजार ७०० हेक्टरने वाढणार असून सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारीच्या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना सभाध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी दिल्यात. विकास भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आ. रणजीत काबंळे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती रिता गजाम, सोनाली गरडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी खळीकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे उपस्थित होते.या खरीपाकरिता ६३ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून २४ हजार ४६२ क्विंटल बियाणे महाबीज कडून तर ३९ हजार ११४ क्विंटल बियाणे इतर कंपन्या पुरविणार आहे. तसेच ७३ हजार ४०० मेट्रीक टन खताची गरज आहे. जिल्ह्यात ठिंबक सिंचनाचा वापर वाढत असल्यामुळे ठिंबक संचामधून देता येतील, अशी विद्राव्य खते कृषी केंद्रामध्ये उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना आ. कुणावार यांनी दिल्या.बँक अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार वर्धा : खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पीक कर्जाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच इतर बँकाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. तसेच पीक कर्जाचे वितरण करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करावे.(प्रतिनिधी) ३० मे पूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचनाखरीप हंगाम २०१७-१८ साठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यासोबतच बँकांनी ३० मे पूर्वी ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरीत करावे, अशा सूचना खरीप हंगाम आढावा बैठकीचे अध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी केल्यात. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली.सरकारी कंपन्यांवर कारवाईभूईमुगांच्या प्रात्याक्षिकासाठी शेतकऱ्यांना नॅशनल सिड्स कॉर्पोरेशनने पुरविलेले बियाणे बोगस निघाले यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे प्रकरण खासगी कंपन्याबाबत घडले असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तोच नियम सरकारी कंपन्यांना लागू करून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या आहेत.