शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
5
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
6
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
7
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
8
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
9
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
10
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
11
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
12
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
13
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
14
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
15
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
16
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
17
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
18
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
19
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
20
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?

कालवा पाझरल्याने शेताचे नुकसान

By admin | Published: May 07, 2017 12:37 AM

पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे.

बांधकामाला तडा : झुडुपांचा विळखा तर कुठे अर्धवट कामांमुळे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे. याची झळ पिकांना बसत असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. तालुक्यातील पेठअहमदपूर, परसोडा, खडकी, गोदावरी या चार मौजामधील अवस्था बिकट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अप्पर वर्धा धरण विभाग व तालुक्यातील तलावांमधून पिकांसाठी पाणी सोडल्या जाते. पेठअहमदपुर कडून परसोडाकडे जाणाऱ्या कालव्याला जागोजागी तडा गेल्या आहे. अर्धवट बांधकाम झाल्यामुळे कालव्यातून वाहणारे पाणी थेट शेतात साचत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कालवे विभागाला अवगत केले तरी दुरुस्ती केली नाही. या पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या बाजुला गटारगंगा तयार झाली आहे. कालवा आणि शेत याला लागून असलेल्या रस्त्याची यामुळे दुरवस्था निर्माण झाली आहे. बांधकाम करण्यासाठी खोदून ठेवलेल्या कालव्याची अवस्था खराब झाली आहे. गाळ साचला, झाडे-झुडपे वाढली, दगड पडल्याने पाणी सोडण्याचे गेट बंद झाले, अ‍ॅप्रोच मधून पाणी पाझरत आहे. काळ्या मातीमुळे बांधलेला भागही दबत असल्याने कालव्याचे भविष्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शेतीला पाणी मिळावे याच हेतुने कालवे बांधण्यात आले. मात्र गत अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीला केराची टोपली मिळत आहे. आष्टी तलावाद्वारे बांधकाम झालेला कालवा देखील अर्धवट आहे. कालव्यात बाभळीची झाडे वाढली आहे. ती तत्काळ काढून साफसफाई करावी, लिकेज ठिकाणी दुरुस्ती करून शेतात पाणी पाझरणार नाही. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीच कालवे व पाटसऱ्या बांधण्यात आल्या. यातील दुरुस्ती व साफसफाई करण्याचे आदेश दिले असून पाणी सोडणारे व सफाई मजुर हे कामात दिरंगाई करीत असल्यास कारवाई करणार - पी.पी. पोटफोडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे धरण विभाग अमरावती