शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

‘एम किसान’ महिन्यापासून बंद

By admin | Published: September 12, 2015 1:58 AM

शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली.

रूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली. ती काही दिवस सुखरूप सुरू राहिली; मात्र गत महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकही एसएमएस गेला नाही. या यंत्रणेमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येत असल्यामुळे ही योजना थेट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या शेतात पीकं बहरली आहेत. अशात निसर्गाचा लहरीपणा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आड येत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा हल्ला होत आहे. याची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता असलेली ही ‘एम किसान’ योजना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नव्या रोगांची व पिकांवर आलेल्या सध्याच्या किडवर कसे नियंत्रण मिळवावे याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता या एम किसानची गरज भासत आहे. ऐन गरजेच्यावेळी शासनाची ही यंत्रणा शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत आहे. ही योजना केवळ एका वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविताना शासनावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड येत असल्याने ही योजना सध्या बंद असल्याचे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून कळविले असल्याचे वर्धा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. या योजनेकरिता आणखी किती निधी लागणार यावर होणाऱ्या चर्चेअंती ही योजना राबवावयाची अथवा नाही यावर निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेला ‘एम किसान’ येत्या काळात सुरू राहील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.