शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:12 IST

जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

वर्धा : केंद्रात आणि राज्यातील सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, हुकूमशाही व ठोकशाही पद्धती अवलंबली आहे. यातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. राज्यभरात सात सभांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या दि. १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

स्थानिक इंदिरा सद्भावना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले की, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षाचे उपनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

औरंगाबाद येथून वज्रमूठ सभेची सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये शेवट होणार आहे. या दोन्ही सभेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. पुणे व नाशिक येथील जबाबदारी राष्ट्रवादीने तर नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील जबाबदारी काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष कामाला लागले असून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे १ हजार २०० कार्यकर्ते या सभेला उपस्थित होणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे..

घर म्हटलं की भाड्याला भांडे लागतातच. हा तर पक्ष आहे, यामध्ये मतभेद व विचारभेद असणारच. त्यामुळे उणेदुणे काढण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे. या मतभेदामुळे काँग्रेसपुढे ही वेळ आली आहे. आता तरी दिवस पालटविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही खासदार धानोरकर यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी