शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Maharashtra Election 2019 ; ‘दादां’च्या नामनिर्देशनाला ‘ताई’च गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या राज्यपाल दिवंगत प्रभा राव यांचा देवळी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो.

ठळक मुद्देमतदारसंघात जोरदार चर्चा : लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री, विद्यमान आमदार रणजित कांबळे यांनी उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना कांबळे यांच्या भगिनी व महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस या अनुपस्थित होत्या. त्यांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा या मतदारसंघात होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, चारूलता टोकस या गुरुवारी वर्धा जिल्ह्यातच होत्या. कॉँग्रेसचे वर्धा येथील उमेदवार शेखर प्रमोद शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उपस्थित होत्या. मात्र, शुक्रवारी बंधूंचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची गैरहजेरी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व हिमाचलच्या राज्यपाल दिवंगत प्रभा राव यांचा देवळी हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जातो. २० वर्षे त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर या मतदारसंघातून चारूलता टोकस यांचे मावसबंधू रणजित कांबळे हे निवडून आलेत. तेही मागील २० वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. चारुलता टोकस यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत टोकस यांच्या प्रचाराच्या सुरुवातीलाच रणजितदादा आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. अशा परिस्थितीतही चारूलता टोकस यांनी निवडणुकीची धुरा आर्इंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भरवशावर सांभाळून नेली. त्यावेळीही दादांच्या गैरहजेरीची चर्चा मतदारसंघात होती. प्रभातार्इंच्या खऱ्या वारसदार मैदानात आल्यामुळे दादा व दादांचे सुभेदार नाराज झाले, असेही बोलले जात होते. या मतदारसंघात चारूलता टोकस १५ हजार मतांनी माघारल्या. गृह मतदार संघ व ४० वर्षांपासून राव, कांबळे परिवाराच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपला मिळालेले मताधिक्य हे दस्तुरखुद्द भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना धक्का देणारेच होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चारूलता टोकसच येथील उमेदवार राहतील, अशी चर्चा होती. दादांना पक्षाने उमेदवारी दिली; मात्र नामांकनाच्या मुहूर्तावरच तार्इंची गैरहजेरी सर्वांना धक्का देणारी ठरली. या मतदारसंघातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रभाताई व चारूताई यांची आठवण आज प्रकर्षाने होत असल्याचे सांगितले. निवडणुकीची रणधुमाळी आता या मतदारसंघात गृहकलहात गाजणार असे दिसत आहे.आज मुंबई येथे महिला कॉँग्रेसच्या अखिल भारतीय निरीक्षकांची बैठक होती. या बैठकीमध्ये निवडणुकीच्या कालावधीत कोणत्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी सोपवायची यावर चर्चा होणार होती. या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे असल्यामुळे आजच्या देवळी येथील नामांकन अर्जाच्या मिरवणुकीला उपस्थित राहता आले नाही.- अ‍ॅड. चारूलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, महाराष्टÑ महिला कॉँग्रेस.

टॅग्स :deoli-acदेवलीRanjit Kambaleरणजित कांबळे