शहरं
Join us  
Trending Stories
1
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
2
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
3
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
4
स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर
5
NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ
6
छाया कदम यांनी सांगितली सौंदर्याची खरी व्याख्या; म्हणाल्या, "दीपिका, आलियासारखं..."
7
"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण
8
Ola Electric share: ₹१६० पर्यंत जाऊ शकतो 'या' इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा शेअर; गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"जिच्या वडिलांनी अफजल गुरूला वाचवण्याचा प्रयत्नन केला, अशा महिलेला..."; मालीवाल यांचा केजरीवालांवर निशाणा
10
Women’s T20 World Cup: महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं तब्बल १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम
11
मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल
12
९ महिने बेरोजगार, पैशांसाठी स्ट्रगल; इंटिमेट सीन्सने चर्चेत आलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
13
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
14
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
15
प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा'वरून आमंत्रण; मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यावर श्रेया म्हणाली...
16
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
17
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
18
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
19
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
20
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!

धक्कादायक! विजेची तार तोंडात धरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या, मदतीच्या प्रतीक्षेत गेला आणखी एक जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 6:01 AM

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली.

वर्धा :

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिवंत विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गणेश श्रावण माडेकर (वय ३६, रा. पढेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यांतर्गत पढेगाव येथील गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी तूर, सोयाबीन व कपाशीची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. त्यात माडेकर यांच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेले. नेत्यांसह केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत मिळेल, अशी आशा त्याला होती; पण हवालदिल झालेल्या गणेश यांचे मनोधैर्य खचले. त्यातच त्यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून जीवनयात्रा संपविली. सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

पढेगावावर पसरली शोककळागणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. गणेशच्या आत्महत्येमुळे माडेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पढेगावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी