शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वणा नदीच्या पुरामुळे नंदपूर गावाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:50 IST

नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामस्थांत भीतीचे वातावरण : नागरिकांनी साहित्य सुरक्षित जागी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : नंदपूर गाव वणा नदी आणि विदर्भ नाल्याने वेढले आहे. नदी आणि नाल्याचे पाणी वाढतीवर असल्याने पुराचा धोका वाढला आहे. अशी माहिती नंदपूरचे माजी ग्रा.पं.सदस्य आणि समुद्रपूर तालुका भाजप उपाध्यक्ष महेश हिवंज यांनी दिली.हमदापूरपासून अकरा कि.मी.अंतरावर भोसा पाटीपासून आतमध्ये हे गाव आहे. या गावाच्या एका बाजूला वना नदी तर मागच्या बाजूने विदर्भ नाला वाहतो. या दोन्हीचा चा संगम गावाच्या मागच्या भागात झालेला आहे.पावसाला गुरूवारला सायंकाळी सुरूवात झाली असली तरी सकाळपासून जोरदार पावसाने मात्र नदी, नाला दुथडी भरून वाहू लागला. पाणी पातळी वाढतच असल्याने गावकरी सतर्क झाले. गावाच्या खालच्या भागातील रहिवाशी यांनी धान्य, खते, महत्वाचे सामान ओळखीच्या घरी हलवायला सुरुवात केली आहे. गावातील नागरिक कामाला लागले असून साहित्य सुरक्षित ठिकाणी पोहचविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे हिवंज यांनी लोकमतला सांगितले. नंदपूरच्या पुरस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष असून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे.नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराशुक्रवारी सकाळपासून वर्धा जिल्ह्यात सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यातील नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावात दंवडी देण्यात आली असून नदीकाठावर नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव आणि नांद येथून पाणी सोडण्यात आल्याने वणा नदीची पातळी वाढत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर