शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

‘अमृत’ होतेय कडवट; चौकशीचे धडकले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:11 IST

शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा,

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले पत्र : पंकज भोयर यांच्या तक्रारीवरुन घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अमृत योजनेंतर्गत विविध कामांसह हरित योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांची विश्वेश्वरय्या नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलोजी ( व्हीएनआयटी) नागपूर या संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करीत एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे शहरासाठी ‘अमृत’ ठरणारी योजना नियोजनाअभावी ‘कडवट’ होताना दिसून येत आहे.अमृत योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूमिगत पाणी पुरवठा योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना तसेच हरित योजनेंतर्गत उद्यानांची कामे सुरु आहेत. या कामांबाबत स्थानिक नागरिक, नगरसेवक व विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्याने या सर्व कामांची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राव्दारे केली होती. तसेच या सर्व कामांची पाहणी करीत आमदार भोयर यांनी जोपर्यंत फोडलेल्या रस्त्याची दुरुस्ती होणार नाही; तोपर्यंत योजनेतील पुढील काम सुरु करु नये, अशा सूचना देत काम बंद पाडले आहे.याबाबत आयुक्त संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनाही या कामांतील नियोजनशुन्यता लक्षात आणून दिली. परिणामी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून या योजनेची व्हीएनआयटी नागपूर मार्फत चौकशी करुन कार्यवाही करावी तसेच एक महिन्याच्या आत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले आहे. त्यामुळे आता या योजनेच्या चौकशीला गती मिळणार असून काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमदारांनी या तीन योजनेतील विविध मुद्यांकडे वेधले लक्षभूमिगत पाणी पुरवठाअधिकाऱ्यांकडून सर्व्हे बरोबर केला नसून जुनी पाईपलाईन व नवीन पाईपलाईन याचा कुठेही ताळमेळ जुळत नाही. पाणी पुरवठा योजनेची जवळपास सहा कि.मी.पाईपलाईन शिल्लक राहिली आहे. जवळपास ६० टक्के लोकांना नळाच्या नवीन जोडण्या मिळाल्या नाही. कंत्राटदाराने मुख्य काम आटोपते घेत किरकोळ कामाकडे दुर्लक्ष केले आहे. मनुष्यबळ जास्त लागत असल्याने खोदलेले रस्ते, गट्टू व नालीचे काम अर्धवट सोडले आहे. नगर पालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कामात कुठलाही ताळमेळ नसल्याने कंत्राटदाराची मनमर्जी सुरु आहेत. कामांवर देखरेख ठेवण्याकरिता अधिकारी उपस्थित राहत नाही.भूमिगत मलनिस्सारणसुरुवातीला ३ मीटर ते शेवटी ८ मीटर खोदकाम करायचे असून यानुसार कुठेही काम केलेले नाही. बनविलेल्या चेंबरचा दर्जा राखल्या जात नाही. या योजनेकरिता मजबूत रस्ते मधोमध फोडले आणि आडवेही फोडले जात आहे; पण दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील ९० टक्के नागरिकांचे शौचालय मागच्या बाजुने असून पाईप समोरुन टाकण्यात येत आहे. त्यामुळे शौचालय खाली आणि पाईप वर आल्यानेही अडचण वाढली आहे. या योजनेची सुरुवात करताना लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विचारात घेऊन जनजागृती केलेली नाही.हरित योजनाया योजनेतून सुरु असलेल्या कामांची जागा काळ्या मातीची आणि भरपूर पाण्याची असल्याने केवळ पाच ते सहा फुटावरच कॉलम घेतले आहे. काही कामांना अल्पावधीतच तडे गेलेले दिसून येत आहे. कामाच्या प्रगतीची व दर्जाची कुठलीही शहानिशा न करता एकाच महिन्यात मोठी देयक कंत्राटदाराला अदा केली जात आहे. त्यामुळे या योजनेत अधिकारी व कंत्राटदार दोषी असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर