शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पर्यावरण संवर्धनासाठी समग्र शिक्षण अंतर्गत शाळांमध्ये आता 'इको क्लब' ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 5:35 PM

Vardha : अक्षरे गिरवण्याबरोबर विद्यार्थी लावणार निसर्गालाही जीव संगोपनाची जबाबदारी खांद्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, म्हणून सर्व शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी अक्षरे गिरवण्याबरोबर निसर्गालाही जीव लावणार आहेत. पर्यावरणाच्या धड्याबरोबर शाळेत रोपटी लावून त्यांचे संगोपनही करणार आहेत. वृक्षारोपण केलेल्या झाडांना विद्यार्थ्यांची व वर्गाची नावे दिली जाणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोपक्रमशील नागरिक तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. या धोरणानुसार समग्र शिक्षण अंतर्गत शाळेतील इको क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरणाच्या समस्या जाणून घेणे, पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रमांचा समावेश करणे, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक असावे यासाठी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन होणार आहे. फक्त क्लब स्थापन करून थांबायचे नाही. तर पर्यावरण विषयक जागृती, ई वेस्ट, प्लास्टिक यांचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहे. इको क्लब अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे. त्यासाठी एका आठवड्याचे शिबिरही आयोजित करणार आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे, ई- कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती दिली जाणार आहे.

मुख्याध्यापक राहणार इको क्लबचे प्रमुख शाळेत स्थापन केलेल्या इको क्लबचे प्रमुख मुख्याध्यापक राहणार असून प्रत्येक शाळेत दोन शिक्षक व एक वर्ग प्रभारी उपक्रम राबविण्यास मदत करणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि समन्वयक प्रत्येक वर्गातील मुलांचे पालक इको क्लबचे सदस्य राहणार आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहित करतील. इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

"नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरण मित्रत्व आणि पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे."- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :wardha-acवर्धा