शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

शेतमालाला दीडपट भाव, नुसताच ठरतोय जुमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:14 IST

कापूसविक्रीतून हाती घाटाच : एकरी ५ हजारांचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : दिवाळीच्या तोंडावर बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात खासगी व्यापारी कापसाला सात ते साडेसात हजार भाव देत आहे. एक एकरातील कापूस लागवडीसाठी येणारा खर्च व त्यातून सरासरी येणारे उत्पादन व बाजारभाव याची जुळवणी केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपयांचा थेट फटका बसतो आहे. शासनाच्या वतीने शेतमालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन नुसतेच जुमला ठरते आहे. तर शेतकऱ्याने केलेली मेहनतही हाती पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यासाठी सरासरी शेतकऱ्यांना सरासरी ३३ हजार ७०० रुपये खर्च आला. यात उन्हाळा वाही मशागत २००० रु., सारे अथवा बेड फाडणे १००० रु., बियाणे दोन बॅग १ हजार ६०० रुपये, लावण खर्च ५०० रु., डवरनी ४ फेर २००० रू., खताची मात्र दोन वेळा दोन हजार रू., खत टाकने मजुरी ६०० रू., दोनवेळ नींदन खर्च १० हजार रू, फवारणी औषधी खर्च पाच हजार, फवारणी मजुरी दोन हजार, वण्य प्राण्यापासून संरक्षणासाठी कंपाउंड करणे एक हजार, वेचणी खर्च पाच हजार, कापूस विक्रीसाठी बाजारात शेतमाल वाहून नेण्यासाठी भाडे एक हजार असा खर्च आला आहे. यात मजूर उपलब्ध असण्यावर मजुरी अधिक तर डवरण, फवारणीसाठी वेळेवर मजूर बैलजोडी न मिळाल्यास अधिकचे भाडे द्यावे लागले. तो खर्चही यातून वगळण्यात आला आहे. 

कापूस पिकाचा सरासरी विचार केल्यास एकरी चार क्विंटलपेक्षा अधिक होण्याची शक्यता नाही. अशात दिवाळी सण गोड व्हावा म्हणून शेतकऱ्यांकडून शीतादही केलेल्या कापसाची वेचणी करीत शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेला जातो आहे. मात्र भाव दबावात असल्याने नाइलाजास्तव शेतकऱ्यांना सात साडेसात हजारांना कापूस व्यापाऱ्यांच्या घशात टाकावा लागतो आहे. कापूसविक्रीतून शेतकऱ्याला २८ ते ३० हजार रुपये हाती पडणार आहे. शेतीवर होणारा खर्च, बघता उत्पादनातून हाती पडणारी रोख यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. हीच गत सोयाबीन पिकाची आहे. तर तूर पीक यंदाच्या अतिवृष्टीत सखल भागातील पीक मोठ्या प्रमाणात जळून नष्ट झाले. 

कपाशीवर आला लाल्या किमान कपाशीच्या दोन वेच्यानंतर कपाशीवर लाल्या रोग आढळून येत होता. यंदा मात्र पहिली वेचणीच्या वेळीच लाल्या रोगाचे आक्रमण दिसून आले आहे. पाने लाल पडली असून बोंडे धरायच्या आधीच झाडे वाळतील की काय अशी स्थिती दिसून येत आहे.

टॅग्स :wardha-acवर्धा