शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 16:27 IST

तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदेवळी तालुक्यातील मलातपूर येथील घटना

वर्धा : तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. अशातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवळी तालुक्यातील मलातपूर येथे घडली असून, यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी सागर पजगाडे यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. त्यांनी मलातपूर येथे आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. त्यासाठी त्यांनी बँकचे १५ लाखांचे कर्जही घेतले आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय जोमात येत नाहीच तो महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला. तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सागर पजगाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.

असे ठेवले जायचे तापमानावर नियंत्रण

पोल्ट्री फार्मचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्याने शेडमध्ये तीन एक्सझॉस्ट फॅन आणि दोन मोठे कूलर लावले आहेत. सोबतच आवश्यक ठिकाणी वेळोवेळी पाण्याचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवले जायचे; परंतु महावितरणकडून खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तब्बल पाच तास सुरळीत न करण्यात आल्याने हे सर्व बंद होते. अशातच पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या मरण पावल्या.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्राथमिकदृष्ट्या उष्माघातने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने देवळी पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwardha-acवर्धा