शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सेवाग्राम विकास आराखड्यातून पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे  साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला.

श्रीकांत तोटेलोकमत न्यूज नेटवर्कपवनार : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार गावाच्या विकासासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मोठा गाजावाजा करण्यात आला. सद्यस्थितीत हे काम ९० टक्के पूर्ण झाले असले तरी या कामातून चक्क पवनारचे ग्रामपंचायत भवन वगळण्यात आल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे  साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाली. परंतु, आश्रमाच्या बाजुला फक्त प्रवेशद्वार व माती काम करण्यात आले. नदीतील बराच भाग मुरूम टाकून बुजवल्यामुळे त्या कामाला राजेंद्र सिंह व ब्रह्म विद्या मंदिर प्रशासनाकडून विरोध दर्शविण्यात आला. सर्वांची मनधरणी झाल्यानंतर पुन्हा काम सुरू होणार होते. त्यासाठी परिसरातील अतिक्रमणही काढण्यात आले. या प्रक्रियेला वर्ष लोटले तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. इतकेच नव्हे तर या विकास आराखड्यात पवनार गावातील अंतर्गत सुविधा व ग्रामपंचायत भवनही समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, निविदा काढल्यानंतर ग्रामपंचायत भवन रद्द झाल्याने पवनार येथील ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.

कठडे गेले चोरीला- धाम तीरावरील पायऱ्यांवर बसविण्यात आलेले कठडे सध्या बेपत्ता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त न केल्याने हे कठडे चोरीला गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.

फुलझाडे करपली- पवनारच्या धाम तीराचे रुपडे बदलावे म्हणून या ठिकाणी काही परिसरात फुलझाडे लावण्यात आली. पण रोपट्यांना वेळोवेळी पाणी देण्यासाठी असलेली मोटार बिघडल्याने व ती वेळीच दुरूस्त न केल्याने सध्या अनेक फुलझाडे करपली आहेत.

ग्रामपंचायतसमोर अनेक प्रश्न

- काम पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीने ते आपल्या ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. शिवाय त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न सध्या ग्रामपंचायत प्रशासनासमोर आहे. हे विकासकाम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ किंवा वन विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनधरणी सुरू आहे, असे असले तरी तोवर झालेले हे विकासकाम शाबूत राहावे हे तितकेच खरे.

पवनार येथील विकासकाम अजूनही पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे ग्रा. पं. प्रशासनाने ताबा घेण्यास नकार दिला आहे. पवनार येथे झालेल्या विकासकामाची देखभाल दुरूस्ती कशी करावी, हा प्रश्न ग्रा. पं. प्रशासनासमोर आहे.- शालिनी आदमने, सरपंच, पवनार.

 

टॅग्स :PavnarपवनारSewagramसेवाग्राम