शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

धाम नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 11:40 PM

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/ खरांगणा (मो.) : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे मुल्यांकन केले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.धाम नदीवरील हा राज्य महामार्गावर असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे बांधकाम साधारणत: १९६४ मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान या पुलावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक झाली. हा मार्ग मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या मार्गामुळे जवळपास १०० किलो मीटरचा फेरा वाचतो. या मार्गावर कोणताही टोलनाका नसल्याने ट्रक, कंटेनरची मोठी वर्दळ असते. या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी रात्री या पुलाचा मधातील एक खांब खचल्याने पुलही तुटला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष शेगांवकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करुन वर्धेकडे जाणारी वाहतूक बांगडापूर-माळेगाव-आकोली मार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भित्रे यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता साखरवाडे आणि नागपुरातील अधिकारीही घटनास्थळाला भेट देणार असल्याचे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले.या पुलाची एक बाजू खचायला लागली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाचे आॅडिट होणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाही.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा पुल खचला.- राजू राठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, मोरांगणामहाकालीचे प्रसिद्ध देवस्थान या मार्गावर आहे. ज्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती. नंतरच्या काळात मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरल्याने वाहतूक वाढली. लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करुन मार्ग मोकळा करावा. त्यामुळे लोकांना लांब पल्ल्याने जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.-नितीन अरबट, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी