शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

दिंडीच्या माध्यमातून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती

By admin | Published: June 19, 2017 1:13 AM

आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा व ग्रामपंचायत रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढून कीटकजन्य

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडीलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा व ग्रामपंचायत रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढून कीटकजन्य व जलजन्य आजारावर जनजागृती करण्यात आली. या दिंडीला जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखविली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अयुब अली तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रविण धाकटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, ग्रामपंचायत सदस्य गीता कुमरे, कल्पना शेंदरे, नरहरी आखूड, विमल कन्नाके, हंसा राऊत, आरोग्य सेवक निलेश साटोणे यांची उपस्थिती होती.डॉ. चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना लोकांच्या सहार्याशिवाय कुठल्याही शासकीय योजना खऱ्या अर्थाने पूर्णत्त्वास जाऊ शकत नाही. किटकजन्य व जलजन्य आजाराना आळा घालण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून सहकार्य करावे. घर व परिसर पाणी साचनार नाही, त्यात डासांची निर्मिती होणार नाही याची काळजी घेत प्रत्येक आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे सांगितले. पावसाचे पाणी साचून राहील अश्या कोणत्याही वस्तू बाहेर ठेवू नका. त्याचप्रमाणे कुलरमधील पाणी नियमित बदलवावे. अनावश्यक वस्तुचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. घरातील शौचालयाच्या वँन्ट पाईपला साधे कापड बांधा. खताचे उकुरडे गावापासून दूर ठेवा असे उपाय केल्यास आपले गाव रोग मुक्त राहू शकते असेही ते म्हणाले. हुसनापूर व रत्नापूरच्या भजनी मंडळींनी दिंडीत सहभाग घेतला होता. संचालन उटाणे यांनी तर आभार घोडमारे यांनी मानले.