शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गुंजखेडा वाळू घाटावर धाड, पाच तराफे केलेत नष्ट, जिल्हास्तरीय आकस्मिक पथकाची कारवाई

By आनंद इंगोले | Updated: March 2, 2023 17:29 IST

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक

वर्धा :

देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक तपासणी पथकाने धाड टाकली. यावेळी पाच तराफांच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व तराफे जप्त करुन ते नष्ट करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळपर्यंत चालली.

वर्धा नदीपात्रावरील गुंजखेडा येथील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळू उपासा चालतो. यापूर्वीही अनेकदा येथे कारवाई झाल्यानंतरही वाळू चोरट्यांचे ह्य पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्ण असेच सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हा स्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी आपल्या चमूसह बुधवारी दुपारी साडेचार वाजता गुजखेडा वाळू घाट गाठला. यावेळी घाटामध्ये आठ मजुर पाण्यातील वाळू अवैधरीत्या तराफ्याच्या साहाय्याने बाहेर काढत असल्याचे निदर्शनास आले. आणखी घाटामध्ये पाहणी केली असता पाचवा ही तराफा दिसून आला. हे पाचही तराफे जप्त करुन ते नष्ट करण्याचे काम दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरुच होते. एका तराफ्याची किंमत ४० हजार रुपये असून एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केला. या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.पोलिस म्हणतात 'ऑल ईज वेल'पुलगाव पोलिस विविध कारणांमुळे चांगलेच वादात सापडत आहे. या पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गुंजखेडा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरु होता. परंतु तरीही पुलगाव पोलिसांकडून सर्व काही  'ऑल ईज वेल' असल्याचे वरिष्ठांना सांगितले जात होते. परंतु या वाळू चोरीच्या माध्यमातून कुणाचे 'ऑल ईज वेल' होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खनिकर्म अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून गाठला घाटपोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने वाळू चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता वाळू चोरटेही सजग झाले आहे. अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात आहे. कोणत्या अधिकाऱ्यांचे वाहन कोण्या दिशेने जातात, यावर लक्ष ठेवण्याकरिता खबऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईवर ही परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी चक्क दुचाकीवरून गुंजखेडा येथील वाळू घाट गाठत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, तुषार शिंदे, तलाठी भारत डेहनकर, अजय नागे व मनोहर हांडे यांचा समावेश होता. जिल्ह्यात कुणीही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला.