शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आमदारांसमोर महावितरण कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

 थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) या तीन गावांतील ग्रामस्थांसह सरपंचांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी जाऊन सरपंचांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपविभागीय अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून आश्वस्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही. गावातील पथदिव्यांमध्ये बिघाड आल्यास ‘हे आमचे काम नाही’ असे लाईनमन सांगतो. कार्यालयात गेल्यावर कनिष्ठ अभियंता जीवतोडे व लाईनमन मानकर उडवा-उडवीची उत्तरे देतात, आदीमुळे केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच आ. डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसल्याने सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे यांना बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. आमगाव (खडकी) तील इंदिरानगर व नवरगाव (पुनर्वसन) येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील वीज जोडणी गावठाणच्या फिडरवर नसल्याने या गावात नियमित पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याचे वारंवार ग्रामस्थांनी कळविले. गावठाण फिडरवर जोडणी करण्याची मागणीही केली पण, दखल घेतली नाही. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व लाईनमनची बदली करण्याची मागणी रेटून धरली. अखेर उपविभागीय अभियंता खोडे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने रोष निवळला. यावेळी केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, उपसरपंच सुनील धुमोने,आमगावच्या सरपंच नंदा मंगाम, नवरगावचे सरपंच संजय गजांम, जि. प. सदस्य विनोद लाखे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विजय खोडे, फारुख शेख, कृष्णा वाकडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरmahavitaranमहावितरण