शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:51 IST

आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआमदार केळझर बँक शाखेला भेट : चार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालतो कारभार

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शाखा व्यवस्थापक पवन राईकवार यांच्या आमदारांना बँकेतील कामकाजाबाबत माहिती दिली.सध्या पावसाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. केळझर येथील बँकेत दहा गावाचे जवळपास ११ हजार खातेधारक आहे. येथे ४२३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून टप्प्याटप्प्याने त्याची यादी येत असल्याने यादीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती दिली जात आहे. पुढील यादीत आणखी आणखी २०० शेतकऱ्यांचे नावे येतील अशी माहिती शाखा व्यवस्थापक राईकवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. शेतकऱ्यांवरील कर्ज हे शासनाकडून माफ होत असून आम्हाला फक्त व्याज माफ करण्याचेच अधिकार आहेत. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबी समजून घेतल्या तर काम अधिक सोईस्कर ठरेल. असे यावेळी आमदारांना बँक प्रशासनाने सांगितले. या शाखेत शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक यांच्यासह संगणक चालक व रोखपाल असे चार कर्मचारी आहेत. यांच्या सहायाने कर्जाची सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी शेतकरी आशिष ईरुटकर, विलास नगराळे, वडगांव जंगली ,बाबाराव नरड, वासुदेव नखाते यांच्याशी आमदार डॉ. भोयर यांनी चर्चा केली. व कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास सेलू तहसील कार्यालयात संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आमदार पंकज भोयर सोबत सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने व विजय खोडे, विलास वरटकर, अशोक कलोडे, चंद्रशेखर वंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी अजूनही जिल्ह्यात १३ ते १४ हजार शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाही. त्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे आता पीक कर्ज घेतांना त्यांना बँकेत त्रास सहन करावा लागत आहे. बँकेकडे मनुष्य बळाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना बरेचवेळा परत जावे लागत आहे.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रPankaj Bhoyarपंकज भोयर