शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

परतीच्या पावसाचा खरिपाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:18 AM

जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले. खरीपाच्या प्रारंभी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

ठळक मुद्देजिल्हाभर पाऊस : अनेकांच्या सोयाबीनची गंजी झाली ओली; शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले. खरीपाच्या प्रारंभी पावसाच्या प्रतीक्षेत शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तर आता परतीच्या पावसाने शेतात कसेबसे आलेल्या उत्पादनाची धुळदान केल्याने शेतकºयाच्या डोळ्यात पाणी आले आहे. यंदाच्या हंगामात पावसाने शेतकºयांना फटका दिल्याचे दिसत आहे.हवामान खात्याचा कधी नव्हे तो पावसाचा अंदाज खरा ठरला. जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ज्यांनी सोयाबीनची कापणी करून गंजी लावून ठेवली होती. त्यांचे सोयाबीन ओले झाले तर ज्यांनी कापणीची तयारी सुरू केली त्यांच्या तयारीला ब्रेक बसला आहे. तर मान्सून पूर्व पेरणी केलेल्या कापूस उत्पादकांच्या शेतात कपाशीची बोंडे फुटली असून तो कापूस या पावसामुळे ओला झाला आहे. असे असले तरी या पावसाचा तुरीला लाभ होईल असे शेतकरी बोलत आहे. या पावसामुळे तुरीची वाढ होवून येत्या दिवसात पडणाºया थंडीमुळे तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता शेतकºयांकडून वर्तविण्यात आली आहे. पावसाचा फटका सेलू, आष्टी, पवनार, वर्धा, वायगाव आदि भागांसह इतर गावातील शेतकºयांना बसला आहे.पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकºयांकडून पेरण्या उशिरा झाल्या. तर काहींकडून दुबार पेरणी करण्यात आली होती. यामुळे त्यांच्या कपाशीला बोंडे पकडली असून ती या पावसाच्या माºयामुळे गळत आहेत. तर ओली झालेली बोंडे ढगाळ वातावरणामुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन गेल्याची चिन्हे आहेत तर कपाशीलाही फटका बसला आहे.अनेकांच्या शेतातील बोंडे गळाली, कापूसही पडलाविजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाचा फटका सोयाबीनसह कापूस उत्पादकांनाही बसत असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केलेल्या कपाशीचा कापूस निघणे सुरू झाला आहे. तर उशिरा पेरणी झालेल्या कपाशीला बोंडे आली आहेत. यातच आलेल्या पावसासह काही भागात वारा असल्याने ही बोंडे गळत आहेत. तर ज्या शेतात कापूस फुटला आहे त्यांचा कापूस ओला झाला आहे. यामुळे परतीचा पाऊस शेतकºयांकरिता लाभाचा कमी तर तोट्याचा अधिक असे चित्र निर्माण झाले आहे. या पावसाचा लाभ खरीपापेक्षा रबीला होण्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून आले आहे.आणखी चार दिवस राहणार पाऊससध्या निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस येत आहे. यामुळे आणखी चार दिवस पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. हा परतीचा मान्सून सध्या हाती येत असलेल्या पिकांकरिता धोक्याचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. शेतात असलेली सोयाबीनची गंजी प्लास्टिकच्या कापडाने गुंडाळून ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.