शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

इमारतींचे छप्परही मद्यपींचे अड्डे

By admin | Updated: April 7, 2017 02:05 IST

दारूबंदीच्या जिल्ह्यात अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही दारू बंद झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासन

दारूबंदीचा बोजवारा : शहरातच घेतले जातात सर्वाधिक मद्याचे घोटवर्धा : दारूबंदीच्या जिल्ह्यात अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही दारू बंद झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी दारूविक्रेते तथा मद्यपीही जुमानत नसल्याचे दिसते. शहरातील विविध इमारतींच्या छतावर रंगणाऱ्या ओल्या पार्ट्यांतूनच हे सिद्ध होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीला ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात पोलीस यंत्रणेने दारूबंदीवर प्रभावी अंमल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अद्यापही जिल्ह्यातील दारू बंद होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. शासकीय कार्यालये तथा सार्वजनिक इमारतींच्या छतावर रात्री सर्रास ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे दिसते. विविध इमारतींच्या छतांवर दिसणाऱ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांचे रिकामे पुडके, प्लास्टिकचे ग्लास यावरून ही बाब सिद्ध होत आहे. आर्वी नाका परिसरात असलेल्या काही इमारतींच्या छतावर हे प्रकार नेहमीच चालत असल्याचे तेथील एकूण स्थितीवरून दिसून येते. आर्वी नाका परिसरात काही दुकान गाळे असलेल्या इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या, छतांवर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळतो. मद्यपी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या इमारतींमध्ये मद्याचे घोट रिचवित असल्याचे पाहावयास मिळते. शिवाय अन्य बांधकाम रखडलेल्या इमारतीही मद्यपींचे अड्डे बनल्याचे दिसून येते. काही मैदानांवर पूर्वी चालणाऱ्या पार्ट्या कमी झाल्या असल्या तरी इमारतींतील प्रकार वाढले. दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस यंत्रणेने या अड्ड्यांकडेही लक्ष देत मद्यपींना दंडित करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उत्पादन शुल्क विभाग नावापूरताचदारू खुली असलेल्या जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाकडून महसूल गोळा करण्याचे तथा तत्सम दुकाने, बार यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते तर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री थांबविण्याची जबाबदारी या विभागावर असते; पण वर्धा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग केवळ नावापूरताच असल्याचे दिसते. या विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या तुटवडा असून कारवाईच्या नावावर केवळ फार्स केला जात असल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढत असून मद्यपींनाही आडकाठी होत नसल्याचे दिसते. पोलीस यंत्रणा आणि उत्पादन शुल्क विभागाने सामायिक प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील दारू हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. हे करीत असताना मद्यपींवरही कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी आणि इमारतींतील मद्यपींचे अड्डे बंद करावेत, अशी मागणी सामान्यांतून समोर येत आहे.