शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वांगी शेतकऱ्यांकडून 13 रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात 30 रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

 दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : हल्ली शेतकऱ्यांच्या  वांगी, भेंडी, चवळीसह इतरही भाजीपाल्यांचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा भाजीपाला  कवडीमोल भावाने खरेदी केला जातो, शेतकऱ्यांना  मिळालेल्या भावाच्या दुप्पट भावाने  ग्राहकांना विकला जातो, त्यामुळे  याचा कवडीचाही फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत नाही. भाजीपाल्याच्या  ढासळलेल्या भावबाजीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी   वांगी, भेंडी, चवळी या भाजीपाला वर्गीय उभ्या पिकात जनावरे सोडलीत, तर काहींनी पिकाची निगा राखणे सोडले, पावसाळ्याचे अडीच महिने संपले असताना आपल्या जिल्ह्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उत्पादित चवळी शेंगा, भेंडी, पालक, वांगी, काकडी, ढेमस आदी  भाजीपाल्याचे दर कोसळले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीच्या कैचीत सापडला आहे.         दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या दरवाढीने मात्र, ग्राहकांच्याही खिशाला आर्थिक झळ पोहचत असून गृहिणींचेही बजेट कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

 यंदा तर भाजीपाला उत्पादनाचे वाटोळे झाले आहे. यावर्षी एक एकर शेतात वांग्याची लागवड केली, ऐन वांगी निघण्याच्या भरातच वांग्यांचा दर कोसळला. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकाची निगा राखणे सोडावे लागले, कीटकनाशके फवारणीचेसुद्धा पैसे निघत नव्हता.- किशोर लुंगे, शेतकरी जामनी 

आज मी भेंडी विकायला नेली असता फक्त ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागली, केव्हा केव्हा तर  तोडणीचाही खर्च निघत नाही. बरेचदा माल मंडीत ठेऊन रित्या हाताने घरी परतावे लागते.-विजय बेलसरे, शेतकरी जामनी,

ग्राहकांना परडवेना

 भाजीपाल्याचे भाव फक्त भाजीमंडीतच कोसळतात, यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कोसळलेल्या दराचा भाजीपाला मात्र दारावर येताच  याची दामदुप्पट होते व  नाईलाजाने तो घ्यावाच लागतो.- प्रगती भोयर,  गृहिणी, 

चवळीच्या शेंगा अन् भेंडीचे दर फारच कमी झाले म्हणते पण प्रत्यक्षात दारावर भाजीपाला घेतला तर मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याचे जाणवत नाही , ४० रुपये किलोच्या खाली कोणताही भाजीपाला मिळत नाही.- आशाबाई पन्नासे,  गृहिणी,

भावात एवढा फरक का? 

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते, यामुळे आवक वाढली पण मागणीही घटली यामुळे चवळी शेंगा, वांगी व भेंडीची पुरती वाट लागली आहे,तसेच इतरही भाजीपालावर परिणाम झाला आहे,यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली,आणि चिल्लर भाजी विक्रेते त्यांचा वाहतूक व इतर खर्चवजा करून भाजीची विक्री करतात यामुळे ग्राहकाला याचा विशेष फायदा होत नाही, - प्रमोद फटिंग, भाजीपाला व्यापारी,

 

टॅग्स :vegetableभाज्याmarket yardमार्केट यार्ड