शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

सेलू शहराला होतोय क्षारयुक्त पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : बोरधरणवरून पाणीपुरवठा योजना गेली कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शरीराची हाडे ठिसूळ होणे, अन्न पचन प्रक्रियेत बिघाड, लघवीचा आजार याचे अरुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहे. शरीरास अत्यंत धोकादायक असलेले दूषित पाणी शहरवासी कित्येक वर्षापासून पीत आहेत.बोरधरणवरून सेलूसाठी पाणी पुरवठा करणारी योजना नगर पंचायतीची स्थापना होताच मंजूर झाली. मग घोडे अडले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतात क्षारांचे प्रमाण मोठे असून ते आरोग्यास घातक असल्याचे वैद्यकीय सूत्र सांगते. येथील पाण्यात ६५० ते ७०० टीडीएस आहे. ज्यांची आर्थिक ऐपत आहे, त्यांनी घरी आर.ओ. मशीन लावून त्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो, तर काही जण पाण्याच्या कॅन विकत घेऊन पिण्यासाठी वापरतात. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना नळातून थेट येते तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. यामुळे सर्वसामान्यांचे व लहान मुलांचे आरोग्य धोकादायक वळणावर आहे. या गंभीर बाबीकडे शासनाचे, पाठपुरावा करणाºया नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते. शासनाकडून बोरधरण ते सेलू अशी पाईपलाईन टाकण्याकरिता मोजमापही अभियंत्यांकडून करण्यात आले. चांगली योजना कार्यान्वित होण्याची वाट पाहून सेलूकर थकले; मात्र या योजनेला मूर्त रूप देण्यात आले नाही. ही योजना बारगळली की विचाराधीन आहे, याबाबत नगर पंचायतीकडे माहितीच नाही. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर कोटीने निधी प्राप्त झाला. रस्ते, नाल्या यांचे बांधकाम सुरू आहे. शासनस्तरावरून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करून सेलूला विविध योजनामधून पुरेसा निधी दिला. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र बोरधरणच्या पाणीपुरवठा योजनेबाबत पाठपुरावा केला नाही. सेलू शहराला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा करण्याची आरोग्यासाठी नितांत गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी आहे.लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा नाहीदहा वर्षांपूर्वी शासनाने बृहत आराखडा तयार करून ११ गावांची बोरधरणवरून पाणी पुरवठा योजना तयार केली होती. त्यात बोरी, हिंगणी, किन्ही, मोही, घोराड, सेलू, धानोली आदी गावांचा समावेश होता. कालांतराने ती योजना पुढे सरकली नाही. त्यानंतर नवीन नगर पंचायत निर्माण होताच बोरधरणवरून थेट सेलूत पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याची योजना आली. अभियंत्यांकडून सर्व्हे झाला. मात्र, पुढे काय झाले याविषयी नगर पंचायतीला माहिती नाही. एकाही नगरसेवकाने याचा पाठपुरावाही केला नाही, हे सेलूकरांचे दुदैव आहे.पिण्याच्या पाण्यात टीडीएस शंभरपर्यंत असणे व ते पाणी पिणे वैद्यकीयदृष्ट्या सोईचे मानले जाते. मात्र, सेलूत ६५० ते ७०० टीडीएस असलेले पाणी प्यायले जाते. यामुळे शरीराची हाडे कमजोर झाली आहेत. अन्नपचन प्रक्रिया बिघडत असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी