शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

३० जिल्ह्यातील 'निरंतर शिक्षण' कार्यालयाला लागला ‘फुलस्टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 11:02 IST

सुमारे दहा वर्षांपासून सरकारी अनुदान बंद झाल्याने हे कार्यालय बंद पडणार आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचा आदेश अनुदानासह योजनाही बंद झाल्याने निर्णय

चैतन्य जोशी / जितेंद्र दखणे

वर्धा / अमरावती : राज्यातील ३० जिल्ह्यांतील प्राैढ व निरंतर शिक्षणाधिकारी कार्यालय बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, या कार्यालयाचे कामकाज संबंधित जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. तसा आदेशही संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे शालेय शिक्षण विभागाने पाठविला आहे. त्यात विदर्भातील तब्बल ९ जिल्ह्यांचाही समावेश आहेत.

कार्यालयातील गट ‘क’ आणि ‘ड’मधील स्थायी व स्थायी पदे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात येत आहेत. या पदावरील कर्मचारी संबंधित जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी अथवा आवश्यकतेनुसार विभागातील इतर कार्यालयात वर्ग करण्याची कार्यवाही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी करायची आहे.

सुमारे दहा वर्षांपासून सरकारी अनुदान बंद झाल्याने हे कार्यालय बंद पडणार आहे. अनुदानाअभावी या विभागातील कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या दहा वर्षांत या कार्यालयामार्फत प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याने शासनाने अनुदान बंद केले आहे.

निर्णयामागील ही आहेत कारणे

अल्पसंख्याक व प्राैढ शिक्षण संचालनालय हे राज्यस्तरीय कार्यालय असून, त्याअंतर्गत पाच योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक समाजाच्या शाळा अथवा संस्थांसाठी पायाभूत सुविधा, मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत कार्यक्रम, मराठी भाषा फाउंडेशन, सायबर ग्राम या योजनांचा समावेश आहे. या योजनांचे कामकाज कमी झाल्याने त्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही, म्हणून हे कार्यालय बंद करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

जागेचा ताबा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे

निरंतर शिक्षणाधिकारी या पदावरील गट अ व ब मधील अधिकाऱ्यांची पदस्थापना बदलून देण्यात येणार आहे. तोपर्यंत निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित वर्गातील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात येईल. ही कार्यवाही शिक्षण आयुक्त तत्काळ करतील. कार्यालयातील अभिलेख माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या ताब्यात देऊन पुढील कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. कार्यालयाच्या जागेचा ताबा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.

या जिल्ह्यातील विभाग होणार बंद

अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, नगर, सोलापूर, मुंबई, ठाणे, रायगड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीVidarbhaविदर्भ