शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग; २४ तास विजेच्या केवळ भूलथापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:31 IST

Vardha : शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : महावितरणच्यावतीने २४ तास वीजपुरवठा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गावात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. गावात लोडशेडिंग नसताना तासन् तास वीजपुरवठा बंद राहत असून, पुरवठा सुरळीत कधी होणार, याची माहितीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. याचा फटका पिकांना फटका बसत असून, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

येथील महावितरण विद्युत केंद्र अभियंता कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दीपावली उत्सव चालू आहे. मात्र, अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

रब्बी पिकांची पेरणी शेतशिवारात अंतिम टप्प्यात असून, पिकाला पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, लोडशेडिंगमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलेल्या नुकसानाची भर रब्बीत भरून काढू, या आशेवर शेतकरी कामाला लागला होता. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग केले आहे. त्यात दिवसा वीजपुरवठा खंडित आणि रात्री वीज सुरू, असा प्रकार केवळ वायगाव पुरताच मर्यादित आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. जंगली जनावरांच्या दहशतीत शेतकरी ओलीत करीत असल्याचे चित्र परिसरात दिसून आले आहे. 

शेतकऱ्यांनी या संदर्भात विचारणा केली असता पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नसल्याने लोडशेडिंग करावे लागत असल्याचे बोलले जाते. मात्र, यावर स्थानिक प्रतिनिधी यावर गप्प का, असा प्रश्न वायगाव (नि.) ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

सहा वर्षांपासून समस्या कायम वीजवाहिनीवर लोड वाढल्याने पुरवठा खंडित होते. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. ही समस्या सहा वर्षांपासून आहे. हेच कारण प्रत्येक वेळी समोर केले जाते. यावर आतापर्यंत उपाययोजना का झाल्या नाही, असा प्रश्न पडला आहे.

"कुठल्याही ठिकाणी लोडशेडिंग नाही. मात्र, वायगाव (नि.) येथेच का लोडशेडिंग देण्यात येते. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. मात्र, या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधीही काही बोलायला तयार नाही. दिवसा लोडशेडिंग आणि रात्री वीजपुरवठा, ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार आहे."-प्रशांत विचूरकर, शेतकरी, वायगाव (नि.)

"लोड मॅनेज होत नाही आहे. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. त्या कारणाने लोडशेडिंग करणे गरजेचे झाले आहे. मला या ऑफिसमध्ये दोन महिनेच झाले आहेत. या विषयावर वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो." -विकी बडगे, अभियंता, महा. विद्युत वितरण केंद्र, वायगाव (नि.)

टॅग्स :electricityवीजwardha-acवर्धा