शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सेलूत यंदा कापसाचा भाव पोहोचला 8 हजार 166 रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सध्या देवळीची बाजारपेठ फुलली असून दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक येत आहे.या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ५१ ते ८ हजार ४५५ रुपये भाव मिळत असून येत्या काही दिवसांत हे भाव प्रति क्विंटल ९ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त काढल्यानंतर गेल्या आठवडाभरात देवळी केंद्रावर ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या सेलू मार्केटच्या कापूस लिलावाला शुभारंभ युवा नेते समिर देशमुख यांच्या हस्ते  सभापती विद्याधर वानखेडे, उपसभापती काशीनाथ लोणकर, सदस्य बबनराव हिंगणेकर, केशरीचंद खंगारे, युसुफ शेख, राजेश जायस्वाल, गुणवंत कडू, अनिल जिकार, संदीप वाणी, दिलीप ठाकरे, शीला धोटे, निलिमा दंडारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या  सत्कार करण्यात आला. आधारभूत किमतीने कापूस खरेदीला अजून वेळ असल्याने व ऐन दिवाळी आणी रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पैशाची चणचण असल्याने समिती व्यवस्थापनाकडे खुल्या लिलावाचे आयोजन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचे आवाहन  व्यापाऱ्यांना  केले. यावेळी कापूस व्यापारी साईनाथ  जुवाडी, एस.आर.काॅटन सेलू, साई गोल्ड सेलू, गोल्ड फायबर सेलू, संस्कार उद्योग सेलू, गिरीराज काॅटेक्स सेलू हजर होते. शेतकऱ्यांनी कापूस वाहनांद्वारे आणलेला होता. सभापतींनी उपस्थिती शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ व दुपट्टा देऊन सत्कार केला. कापूस मार्केटच्या आवश्यक सूचना समजावून दिल्या. लिलावामध्ये कापसाला सर्वाधिक भाव ८ हजार १६६ देण्यात आला. लिलावामध्ये कापसाला उच्च भाव मिळत असल्याने व २४ तासांत कापसाचे चुकारे मिळणार असल्याने कापूस लिलावात विक्री करण्याबाबत आवाहन सभापती वानखेडे यांनी केले. मागील वर्षी सेलू शाखेत ४००००० लाख क्विंटल कापसाची विक्रमी आवक आली होती. पारदर्शक व्यवहार व शेतकऱ्यांचा प्रश्नांचे,शंकाचे त्वरित समाधान करण्यास व अडचणी दूर करण्यास समिती तत्पर आहे. सी.सी.आयची कापूस खरेदी दिवाळीनंतर खुल्या बाजारात सुरू होण्याची शक्यता सभापतींनी व्यक्त केली. सदर उद्घाटन प्रसंगी समितीचे सचिव सुफी, उपशाखा प्रमुख भांडारकर, कापूस विभाग प्रमुख पडवे उपस्थित होते. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

देवळीत बाजारपेठ फुलली, दररोज ५ हजार क्विंटलची आवक

- देवळी : देवळी व परिसरातील शेतशिवारात चांगले स्टेपल असलेला कापूस पिकत असल्याने या कासाला खुल्या बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे येथील कापसाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचे व्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सध्या देवळीची बाजारपेठ फुलली असून दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापसाची आवक येत आहे.या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ५१ ते ८ हजार ४५५ रुपये भाव मिळत असून येत्या काही दिवसांत हे भाव प्रति क्विंटल ९ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त काढल्यानंतर गेल्या आठवडाभरात देवळी केंद्रावर ३० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुलगाव बाजारात ८ हजार क्विंटल तसेच शिरपूर येथे ३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यावेळेस कापसाला व्यवस्थित भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. यातच संपूर्ण शेत कापसाने पांढरे झाले असताना मजुरांअभावी त्याची दाणादाण पाहिली जात आहे. एकदाचा कापूस घरी आणून मार्केटमध्ये न्यावा यासाठी त्याची लगबग पाहिली जात आहे. मोठ्या शेतकऱ्यांना यानंतरही भाववाढीची अपेक्षा असल्याने  आपला कापूस साठवून ठेवला आहे.

 

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड