शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

सर्वसामान्यांची सेवा हीच ईश्वरसेवा

By admin | Published: September 13, 2015 1:59 AM

महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान योजना शिबिर सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ होण्यासाठी वरदान आहे.

रामदास तडस : सुमारे पाच हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वर्धा : महाराजस्व अभियानांतर्गंत समाधान योजना शिबिर सर्वसामान्य जनतेची कामे तत्काळ होण्यासाठी वरदान आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध योजनांचा लाभ जनतेला मिळून त्यांना दिलासा देण्याचे कार्य या शिबिराच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. समुद्रपूर तालुक्यात महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन विद्या विकास महाविद्यालय येथील सभागृहात करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. प्रमुख उपस्थिती आमदार समीर कुणावार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, तहसीलदार सचिन यादव व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. खासदार तडस म्हणाले, समाधान योजनेमार्फत शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचत आहेत. शासन लोकाभिमुख असून जनतेच्या जगण्यामध्ये शासनाची महत्वाची भूमिका आहे. परंतु प्रशासनाला लोकसहभागाची अपेक्षाही आहे. कारण कोणताही विकास लोकसहभागाशिवाय शक्य नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी समाधान शिबिराच्या यशस्वीतेकरिता विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असल्याचे नमूद करून संपूर्ण जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. एकाच छत्राखाली नागरिकांची सर्व कामे होत असल्यामुळे समाधानही व्यक्त केले. आ. कुणावार यांनी लोकांना किरकोळ कामांसाठी हेलपाटे घालावे लागू नये म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहचण्याची आणि लोकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी या शिबिरामार्फत उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रशासनामार्फत पोहचविण्याचा मानस आहे. यानुषंगाने समुद्रपूर व वायगाव गोंड या महसूल मंडळामध्ये सदर शिबिर राबविण्यात आले. भविष्यामध्ये सर्व मंडळनिहाय असा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले, शेतकरी, शेतमजुरांसह जनतेचे समाधान झाल्यावरच विकास शक्य आहे. त्यामुळे सर्व जनतेने अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी केले. प्रस्ताविकामध्ये अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या समाधान शिबिरातील विविध उपक्रमांबाबत तालुक्यातील सर्व कार्यालयाने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)