शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सेवाग्राम विकास आराखडा; तब्बल 62 कामे पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परिसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळ्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५०वे जयंती वर्ष व त्यांच्या जिल्ह्यातील आगमनास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाने वर्धाचे सेवाग्राम व पवनारचा विकास करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. या तीनही स्थळांच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मूल्याचे दर्शन घडविणारे आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा आढावा घेऊन मार्चपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश माथुरकर, विद्युत वितरणचे उपअभियंता ईशान कुलकर्णी, मेडाचे जिल्हा व्यवस्थापक अभिनव कुळकर्णी, आराखड्याचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार निरा अडारकर, अरुण काळे, रजनीश गोरे, वसीम खान आदी उपस्थित होते. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा, सेवाग्राम व पवनार येथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परिसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळ्यांचा समावेश आहे. सेवाग्राम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षक यात्री निवास उभारण्यात आले आहे. तीनही ठिकाणी रस्ते व चौकांचे सौंदर्यीकरण, धाम नदीवर सुशोभीकरण तसेच ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प उभारण्यात आले आहे.  ठिकठिकाणी भिंतीवर गांधीजींच्या कार्याची महती सांगणारे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा कामनिहाय आढावा घेतला. सध्या अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभाग व काम करणाऱ्या संस्थांना दिले. वर्धा, सेवाग्राम हे जागतिक कीर्तीचे स्थळ असून, पर्यटकांसाठी आराखड्यातून विविध प्रकारांच्या सुविधाही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी भविष्यात पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम