शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

विदर्भाची लेक... हजारोंची माय, सिंधूताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 10:50 IST

सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.

ठळक मुद्देविदर्भकन्येच्या निधनाने वर्धा, चिखलदऱ्या शोककळा

वर्धा : अनाथांची माय म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटविणाऱ्या माईंचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भ हळहळला आहे. 

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात सिंधूताई सपकाळ यांचा वर्धा जिल्ह्याशी अंत्यंत जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.

वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांनी पतीचे घर सोडले व त्यानंतर त्या अनेककाळ संघर्षमय जीवन जगल्या. वर्धा जिल्ह्यात त्यांनी गोपिका गाईरक्षण केंद्र व विविध सामाजिक संस्था सुरू केल्या. त्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. अलिकडेच त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी वर्धा वासियांच्यावतीने त्यांच्या  विविध सामाजिक संघटनांनी सत्कारही केला.

मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. त्यावर आधारित चित्रपटही निघाला होता. चिखलदरा व्याघ्र प्रकल्पात गवळी लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलने केले. रामू पटेल हे वन राज्यमंत्री असताना त्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. चिखलदऱ्याजवळील शहापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. ममता बाल सदन, वर्धेतील गोशाळेच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत सुरू होते. त्यांच्या मागे अमृत, अरुण, संजय, ममता ही मुले मुली आणि एक दत्तक मुलगा दीपक आणि अनाथांचा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळVidarbhaविदर्भ