शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

वर्ष लोटूनही मिळेना सौर कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले.

ठळक मुद्देयुवा शेतकरी हतबल। वीज महावितरण, सीआरआय एजन्सीची अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेकरिता संपूर्ण प्रक्रिया करूनही वर्षभरापासून शेतात कृषिपंप लागला नाही. शेतकरी संबंधित कार्यालयात येरझारा करून आणि विचारपूस करून अक्षरश: थकून गेला. मात्र, यंत्रणेची अनास्था कायम आहे. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न शेतकऱ्याने केला आहे.गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची जोडणी घेण्यास बाध्य केले. शेतकऱ्याने आई सुनंदा पद्माकर जयपूरकर यांच्या नावे २ फेब्रुवारी २०१९ ला ऑनलाईन प्रक्रिया केली. शिवाय, २४ हजार ७१० रुपयांचे डिमांडही भरले. यानंतर जयपूरकर यांना भ्रमणध्वनीवर सौरपंप बसविण्याबाबतचा संदेशही प्राप्त झाला. सौर कृषिपंप बसविण्याकरिता शेतकऱ्याने सीआरआय एजन्सीची निवड केली. यावेळी एजन्सीचालक आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडून जूनमध्ये सौर कृषिपंप बसवून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सिंचनाची व्यवस्था होणार असल्याने जयपूरकर यांनी शेतात कर्ज काढून अद्रक पिकाची लागवड केली. चार ते पाच लाखांचे उत्पन्न होईल, अशी आशा जयपूरकर यांनी बाळगली. मात्र, सौर कृषिपंप मिळाला नाही. सिंचनाअभावी अद्रकाचे पीक जमिनीतच सडल्याने लागवडीचा खर्च पाण्यात गेला आणि आर्थिक संकट ओढवले. यानंतर जयपूरकर यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, सीआरआय कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सौर कृषिपंप लावत असेल तर लावा, असे उद्धट उत्तर दिले; मात्र वर्ष लोटूनही शेतात सौर कृषिपंप लागला नाही. आठ दिवसांत कृषिपंप न लागल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा जयपूरकर यांनी दिला आहे.वीज वितरणचा अनागोंदी कारभारवीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या संपूर्ण व्यवहाराविषयी हा विभाग अनभिज्ञ आहे. केवळ अपडेट घेत आहोत, असे म्हणून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. जिल्हाधिकाºयांनी या प्रश्नात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी प्रणय जयपूरकर यांनी केली आहे.योजना फसवी असल्याची ओरडसौर कृषिपंपाकरिता जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रक्रिया करीत एजन्सीची निवड केली. मात्र, अद्याप कित्येक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. नेमलेल्या एजन्सीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.बळजबरीने लादली जातेय योजनाशेतकरी वीज वितरणकडे वीजपुरवठ्याची मागणी करीत असताना वीज वितरणचा देण्यास नकार असून सौर कृषिपंप घेण्यास बाध्य केले जात असून बळजबरीने ही योजना शेतकऱ्यांवर थोपविली जात आहे. जिल्हा प्रशासनाचे यावर मात्र, नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक संबंधित यंत्रणांकडून सुरूच आहे.

टॅग्स :agricultureशेती