शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

आॅनलाईन फसवणुकीत शासनाकडून दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2015 1:58 AM

सध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते.

रक्कम परत मिळण्याची संधी : वर्धेत सात महिन्यात २३ जणांना ११.८५ लाखांचा गंडा रूपेश खैरी वर्धासध्या आॅनलाईन खरेदीसह व्यवहाराची प्रथा वाढत आहे. यात अनेकांना गंडा बसतो. काहींना एटीएमचा पासवर्ड विचारून गंडविले जाते. यात अनेकांना लाखोंचा चूना लागतो. अशा आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना आपली रक्कम गेली, ती आता परत मिळणार नाही, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा फसवणुकीत नागरिकांना चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईन व्यवहारात झालेल्या फसवणुकीची रक्कम नागरिकांना देण्याची सवलत शासनाच्यावतीनेच दिली आहे. याचा लाभ घेण्याकरिता आॅनलाईन फसगत झालेल्या नागरिकांना केवळ सायबर सेलच्या माध्यमातून मंत्रालयात असलेल्या ‘सचिव, माहिती व तंत्रज्ञान संचालक’ यांच्या नावे अर्ज करण्याची गरज आहे. हा अर्ज करताना त्यांना शासनाने या संदर्भात दिलेल्या नियमानुसार काही रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरून केलेल्या अर्जाची तपासणी होवून नागरिकांना चोरट्यांनी लांबविलेली रक्कम मिळण्याची संधी आहे. ही संधी केवळ आॅनलाईन फसगत झालेल्यांकरिताच आहे. ज्या कुणी आमिषाला बळी पडून बॅकेत जात रक्कम भरली त्यांना मात्र या सुविधेचा लाभ होत नाही. या सुविधेची माहिती अनेकांना नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेत गत सात महिन्यात एटीएमच्या माध्यमातून २३ जणांना एकूण ११ लाख ८५ हजार ३५२ रुपयांनी गंडा बसल्याची नोंद आहे. या पैकी दोन गुन्ह्यातील १ लाख ८० हजार रुपये वसूल झाले आहे. यातील एक लाख २५ हजार ७०० रुपये कंपनीकडून वसूल करण्यात आले आहे. यात आतापर्यंत केवळ तिघांनाच अटक केल्याची माहिती आहे. अशा प्रकारात झालेल्या फसवणुकीचा शोध लागणे तसे कठीणच. रक्कम मिळविण्याकरिता रकमेनुसार भरावे लागणारे शुल्कफसवणुकीत गेलेली रक्कम मिळविण्याकरिता नागरिकांना गुन्हा दाखल असलेल्या जिल्ह्याच्या सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याची गरज आहे. या अर्जाची किंमत ५० रुपये आहे. हा अर्ज थेट केल्यास कुठलाही लाभ होणार नाही. तो सायबर सेलच्या माध्यमातूनच होणे आवश्यक आहे. शुल्क भरण्याचा नियम १० हजार रुपयांपर्यंत गंडा बसल्यास अर्ज करताना रकमेच्या १० टक्के शुल्क भरावा लागणार आहे.१० ते ५० हजार रुपयापर्यंतच्या नुकसानाकरिता १ हजार रुपयासंह रकमेनुसार ५ टक्के शुल्क भरणे गरजेचे आहे.५० हजार ते १ लाख रुपयांकरिता ३ हजार रुपये आणि रकमेच्या चार टक्के शुल्क तर एक लाखा पेक्षा अधिक रक्कम असल्यास ५ हजार रुपये आणि रकमेच्या दोन टक्के शुल्क भरावे लागतील.माहिती असतानाही फसगत तुमचा एटीएम क्रमांक ब्लॉक झाला, तुुम्हाला नवा क्रमांक देण्यात येत आहे. असे म्हणत एटीएमचा पासवर्ड विचारून फसवणूक करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. अशा घटना घडत असल्याची माहिती नागरिकांना असली तरी अशा थापांना ते बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. सध्या शेतात टॉवर उभारण्यासंदर्भात पैशाची मागणी करून लाभ देण्याच्या आमिषाने फसविल्याच्या घटनाही समोर येत आहे. यापासून नागरिकांनी सावधान राहण्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून जनजागृती एटीएमच्या माध्यमातून फसगत झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्या, त्याच्या तक्रारीही पोलिसात आहे. त्यांचा तपास लागणे तसे कठीणच. मात्र पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. अशी फासगत होण्यापेक्षा नागरिकांनी सावधागिरी बाळगावी असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम म्हणून एसएमएस पाठविण्यात येत आहेत.