शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

‘शेतकरी आरक्षण’ अभियानाला प्रारंभ

By admin | Published: April 26, 2017 12:28 AM

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी

शैलेश अग्रवाल : कर्ज-वीज बिल माफी, रास्त हमीभावाची मागणी वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी द्यावी, वर्षभर रास्त हमीभाव द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून मागास जाती-जमातींना जसे आरक्षण लागू केले, तसे शेतकरी कुटुंबाना शैक्षणिक, नोकरी व पदोन्नतीत आरक्षण लागू करावे या मागण्यांकरिता सेवाग्राम आश्रमातून ‘एकच मिशन, शेतकरी आरक्षण’ अभियान सुरू केल्याची माहिती गोतीर्थ प्रकल्पाचे संचालक व प्रगतशील शेतकरी शैलेश अग्रवाल यांनी दिली. विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेला माजी पं.स. उपसभापती संदेश किटे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अनिल उमाटे, दीवाकर श्रावणकर आदी उपस्थित होते. अग्रवाल पूढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आरक्षणासारखा उपाय राज्यघटनेंतर्गत लागू केल्याने सामाजिक विषमता बव्हंशी कमी झाली आहे. याच न्यायाने शेतकऱ्यांना आरक्षण लागू झाल्यास शिक्षण, नोकरी व पदोन्नतीत संधी मिळेल. महागडे उच्चशिक्षण पैशाअभावी घेऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची मुले, भावंडे मागे राहतात. शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची पद्धत चुकीची आहे. यामुळे आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांची गुणवंत मुले पैशाअभावी अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. आरक्षण मिळाल्यास शिकता येईल, नोकरी व पदोन्नतीद्वारे शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. एकदा सर्व शेतकऱ्यांना बँका, खासगी सावकार आणि वीज बिलापासून मुक्त करावे. नव्याने जीवन जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी केली. शेतकऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील. मार्ग निश्चित नसून राज्यात जिथे शेतकरी बोलवतील, तिथे आपण जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.(कार्यालय प्रतिनिधी)