शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

शहरातील पुतळ्यांना अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते.

ठळक मुद्देनगरपालिकेची डोळेझाक : देखभालही वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील इतिहासाची साक्ष देणाºया अनेक पुतळ्यांना अतिक्रमणाने सदैव विळखा घातलेला असतो. याशिवाय देखभालही वाऱ्यावर असून याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयापुढील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला दररोज मालवाहू वाहनांनी वेढा घातलेला असतो. याशिवाय पुतळ्यावर धुळीचा थर असून स्वच्छता केली जात नाही. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच नगरपालिकेला स्वच्छतेचा पुळका येतो. इतरवेळी पुतळ्यांची देखभाल आणि सुरक्षा वाऱ्यावर असते. वाहनांनी पुतळ्याला वेढा घातलेला राहत असताना याकडे वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष आहे. सुभाषबाबूंच्या पुतळ्याची कित्येक वर्षांपासून रंगरंगोटीही करण्यात आलेली नाही. पुतळ्याच्या आत शोभिवंत आणि फुलझाडांचाही पत्ता नसून जंगली झुडपांचे पीक आले आहे. नागपूर मार्गालगत आरती चित्रपटगृह चौकात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्यालाही वाहनांनी वेढा घातलेला असतो. पुतळ्याच्या समोर जड वाहने नेहमी मुक्कामी असतात. यामुळे अपघाताचाही धोका बळावला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांवर ट्रकमालकांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे येथे नेमका पुतळा तरी कुणाचा, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. पुतळा परिसराचे कित्येक वर्षांपूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. वैविध्यपूर्ण दिवे लावण्यासोबतच कारंजे सुरू करण्यात आले होते. याशिवाय शोभेची झाडेही लावण्यात आली होती. मात्र, देखभालच केली जात नसल्याने अनेक झाडे जळाली असून सद्यस्थितीत कारंजेही बंद आहे. नियमित देखभालच केली जात नसल्याने पुतळ्यांना समस्यांनी ग्रासले आहे. शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. यामुळे अनेक पुतळे धुळीने माखले असताना पालिकेच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासोबतच अतिक्रमणमुक्त करावे, पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी