शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
2
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
3
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
4
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
5
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
6
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
7
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
8
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
9
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
10
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
11
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
12
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
13
Nobel Prize for Economics: अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कोणाला मिळालं?
14
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत
15
झेड श्रेणीच्या सुरक्षेत किती जवान तैनात असतात? केंद्र सरकार व्हीआयपींना कोण-कोणती सुरक्षा पुरवते?
16
बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; 'ते' सहा जण कोण? पुणे कनेक्शनही समोर
17
"नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' ", काँग्रेसची बोचरी टीका     
18
बांगलादेश भारताविरोधात इंटरपोलकडे धाव घेणार, तर समुद्रात चीनसाठी घातल्या पायघड्या
19
SBI मध्ये मेगा भरती, अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; पगार तब्बल 25.75 लाख रुपये...
20
Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल

देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करा

By admin | Published: July 01, 2016 2:13 AM

आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही.

अंकित गोयल : पोलीस विभागातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजनवर्धा : आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही. येथे नेहमी सलोख्याचे वातावरण पाहायला मिळते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसा विचाराचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे. सर्वधर्म समभाव लोकांच्या मानसिकतेतून दिसून येते. आज देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी व्यक्त केले. माहेश्वरी भवन येथे शहर पोलीस विभागाकडून आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते.सर्व धर्माच्या उत्सवांना एकजुटीने साजरे केल्यास बंधुभाव वाढून स्नेह व एकतेचा प्रसार होईल. आज समाजात विघातक प्रवृत्ती वाढत आहे. स्रेह, प्रेम, शांती, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता धार्मिक उत्सवातुनच निर्माण होत असते, असे अंकीत गोयल पुढे म्हणाले. शहर पोलीस विभागातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, मौलाना हसीबूर रहेमान, वरिष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, विदर्भ मुस्लीम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रहेमातुल्ला खान, अभ्युदय मेघे, वर्धा शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, जफर अली, ठाणेदार विजय मगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर ठाणेदार शिरतोडे यांनी केले. संचालन सेक्युलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला बाळा इंगोले, लॉयन्स क्लबचे संचालक अनिल नरेडी, रमेश केला, अविनाश सातव, अ‍ॅड. शाहीद अली, अ‍ॅड. असद खान पटेल, शेख सलील, गुड्डू पठाण, देवा निखाडे, रमेश कच्छवा, गुड्डू अली, परवेज खान, हबीब खान, शेख गफ्फार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, युनुस खान पोलीस उपनिरीक्षक, जामा मस्जिद कमेटीचे सदस्य अताउल्लाह पठाण, प्रा. राजू गोरडे, गिरीश जोशी यासह मान्यवर उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)