शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महत्त्वाकांक्षी ‘नम्मा’ समोर अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन तत्कालीन मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या कार्यकाळात वर्धा शहरातील पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे निश्चत करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कृतीही करण्यात आली. सुमारे ६०.१९ लाखांचा खर्च या विकास कामावर करण्यात आले. स्वच्छ शहर या उद्देशाने कुठल्या शौचालयची निवड करावी तसेच ते शहरातील कुठल्या कुठल्या भागात लावण्यात यावे याबाबतची माहिती घेत नगराध्यक्षांना व मुख्याधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : स्वच्छच्या उद्देशाला मिळतोय खो

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त करून पाठ ठोपाटून घेणाऱ्या वर्धा न.प.च्या स्वच्छता विभागाला सध्या अवकळा लागल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे न.प.तील लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाकांक्षी राहिलेल्या ‘नम्मा टॉयलेट’ समोर सध्या अस्वच्छतेने कळस गाठला आहे. याचे उदाहरण सिव्हील लाईन भागात बघावयास मिळत असून हाकेच्या अंतरावरच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. अस्वच्छतेबाबतची हिच परिस्थिती शहरातील इतर भागात असल्याने स्वच्छच्या उद्देशालाच खो मिळत आहे.स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन तत्कालीन मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या कार्यकाळात वर्धा शहरातील पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे निश्चत करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कृतीही करण्यात आली. सुमारे ६०.१९ लाखांचा खर्च या विकास कामावर करण्यात आले. स्वच्छ शहर या उद्देशाने कुठल्या शौचालयची निवड करावी तसेच ते शहरातील कुठल्या कुठल्या भागात लावण्यात यावे याबाबतची माहिती घेत नगराध्यक्षांना व मुख्याधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले.सदर माहिती घेणाºयांचा उद्देश स्वच्छ शहराच्या अनुषंगाने चांगला असता तरी सध्या स्वच्छच्या उद्देशालाच सध्या न.प.च्या स्वच्छता विभागाकडून बगल दिली जात आहे. शहरातील कचरा कचरापेटीत गोळा होत त्याची योग्य विल्हेवाट लागावी या हेतूने ठिकठिकाणी कचरापेट्या बसविण्यात आल्या. परंतु, या कचरापेट्यांमधून वेळीच कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात नाही. अशाचत मोकाट जनावर त्या कचरापेटीतील कचरा जमिनीवर पसरवून त्यावर ताव मारत असल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. एकूणच स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार प्राप्त करणाऱ्या वर्धा नगर परिषद प्रशासनाने तसेच तेथील लोकप्रतिनिधींनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज असून तशी स्वच्छता प्रेमींची मागणीही आहे.चमू येण्यापूर्वी लागताय फलकस्वच्छ सर्वेक्षण २०१९-२० हा उपक्रम सध्या राबविल्या जात आहे. त्यासाठी दिल्ली, मुंबई येथील पाहणी करणारी चमू वर्धेत येत आहे. आतापर्यंत सुमारे तीन वेळा स्वच्छच्या विविध चमू वर्धेत दाखल होऊन पाहणी करून गेल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी पाहणी करणारी चमू येण्यापूर्वी शहरात ठिकठिकाणी स्वच्छ शहराबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात येतात. शिवाय चमू परतल्यावर हे फलक काढून घेतले जात असल्याने जनजागृतीच्या कामालाच ब्रेक लागत आहे.घंटागाडी नावालाचप्रत्यक घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम न.प.च्या स्वच्छता विभागाच्यावतीने केले जात आहे. असे असले तरी शहरातील अनेक भागात वेळीच घंटागाडी येत नसल्याने नागरिकांकडून रस्त्यावरच कचरा टाकल्या जात आहे. त्यामुळे घंटागाडी नावालाच ठरत आहे.दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्षसार्वजनिक कचरा टाकणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा नागरिकासह व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्याच्या अधिकार न.प. प्रशासनाला आहे. परंतु, मागील आठ महिन्यांपासून शहराच्या विद्रुपीकरणात भर टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे.स्वच्छ वर्धा शहरासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. याच लोकसहभागाच्या जोरावर वर्धा न.प. प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दोन वेळा पुरस्कार प्राप्त केला. शहराच्या विद्रुपीकरणात कुणी भर टाकत असेल तर ते वर्धा न.प. प्रशासन खपवून घेणार नाही. कचरा रस्त्यावर टाकणारे, कचरा जाळणारे तसेच न.प.च्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाºयावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान